नराधम 'लव्ह जिहाद्यांना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा !. नराधम 'लव्ह जिहाद' ना फासावर लटकवा -'रणरागिणी'ची मागणी
मुंबईतील हिंदू तरुणी 'श्रद्धा वालकर' हीचे 35 तुकडे करून तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम लव्ह- जिहादी आफताब पुनावालाच्या विरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण ताजे असतांना उत्तर प्रदेशातील लखनौ येथेही 19 वर्षीय 'निधी' या हिंदू तरुणीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे सूफियान या मुसलमान युवकाने तिला चौथ्या मजल्यावरून फेकून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. या केवळ एक-दोन घटना नसून अनेक उदाहरणे यापूर्वीही समोर आलेली आहेत. जिच्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीची अशी निघृण हत्या कोणी करणार नाही. त्यामुळे या वासनांध आणि नराधम 'लव्ह जिहादी' आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद 'लव्ह जिहाद'ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा 'रणरागिणी'च्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आली.
या आंदोलनात विविध हिंदु संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी 'आता अबला नको तू सबला हो, चंडी, दुर्गा, काली हो !', 'लव्ह जिहादी नराधम आफताबला फाशी द्या, 'लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा !' अशा घोषणाही देण्यात आल्या. हिंदु मुलींना फसवून प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन करणे, त्यांच्याशी 'निकाह' करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, ब्लॅकमेल करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची हजारो प्रकरणे यापूर्वी उघड झाली आहेत. आपल्या मुली बाळींना पळवण्यासाठी हे नराधम आपल्या घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे 'लव्ह जिहाद'च्या घटना रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात 'लव्ह जिहादविरोधी कायदा' करण्यात यावा, यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही सी. अश्विनी सरोदे यांनी या वेळी सांगितले.
राज्यातील चर्चप्रणीत अनाथालये, तसेच कोन्व्हेन्ट शाळेत अल्पवयीन मुला-मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भातील निवेदनात, अल्पवयीन मुला-मुलींवर लैंगिक आणि अन्य प्रकारचे अत्याचार करत असलेल्यांवर पॉस्को तसेच बाल हक संरक्षण कायदा 2005 नुसार गुन्हे नोंदवून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व कोन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालयांमध्ये अत्याचार होत नाही ना, हे तपासण्याकरिता पत्रकार, समाजसेवक, पोलिस, महिला, निवृत्त न्यायाधीश आणि शासकीय अधिकारी यांचे एक 'विशेष तपासपथक नेमून शाळांची चौकशी करण्यात यावी, अशी आम्ही मागणी यावेळी करण्यात आली, असे अधिवक्ता श्रुती भट यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या