राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांना झटका, गावचाच सरपंच अपात्र
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांना आणखी एक धक्का बसला आहे. मिटकरीचे गाव असलेले कुटासा ग्रामपंचायती वर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असलेले कुटासा ग्रामपंचायतीचे बारा सदस्य अपात्र ठरवण्याची धक्कादायक बाब आज समोर आली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशावरून हे सदस्य अपात्र ठरवण्यात आले आहेत. कुटासा ग्रामपंचायत हद्दीत येणारी १५ लाख रुपये किंमतीची एक इमारत बेकायदेशीर पाडल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. यामधे ठरावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.
न्यालयीन प्रकरण असे की, ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ३९ (३) अन्वये विजयसिंग शंकरसिंग सोळंके रा. कुटासा, ता. अकोट जि. अकोला यांनी विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांच्या दि.०६ नोव्हेंबर २०२१ च्या निकालाविरुध्द मा. मंत्री ग्राम विकास यांचे न्यायालयात अपील दाखल केली होती. प्रस्तुत प्रकरणाची सुनावणी दि. २९ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आयोजित करण्यात आली होती. या प्रकरणातील तक्रार अर्जातील मुद्दे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांचा चौकशी अहवाल, विभागीय आयुक्त, अमरावती यांचे महाराष्ट्र तसेच सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षकारांनी केलेला युक्तिवाद व नस्तीत उपलब्ध अभिलेख्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले, कुटासा ग्रामपंचायत इमारत ही सन ६४/८५/८६ मध्ये रु. १५ लक्ष खर्च करुन बांधलेली असून अनंतां रघुनाथ लाखे, सरपंच ग्राम कुटासा ता. अकोट जि. अकोला यांनी पुर्व परवानगी न घेता पाडली. याबाबतचे फोटो पंचायत समिती सदस्य / ग्राम पंचायत सदस्य पानटपरी चालक यांचे प्रतिज्ञालेख व ग्रामस्थांचे निवेदन यामध्ये ग्रा.प. इमारत पाडली असे नमुद आहे. अनंता रघुनाथ लाखे, सरपंच ग्राम पंचायत, कुटासा ता. अकोट जि. अकोला यांच्या म्हणण्यानुसार ग्राम पंचायतीची इमारत ही २९ मे २०२१ रोजी नैसर्गिक आपत्तीमध्ये पडली आहे. मात्र तलाठी मौजे कुटासा-१ यांचे पत्र दिनांक ०९ जुन २०२१ नुसार मौजे कुटासा येथे २९ मे २०२१ रोजीचे नैसर्गीक आपत्ती, अतिवृष्टी वादळवारा याबाबतची कुठलीही नोंद तलाठी कार्यालयात उपलब्ध नाही असे नमुद आहे. पोलीस पाटील कुटासा यांचा दाखला ३१ जुलै २०२१ मध्ये नमुद आहे की, २९ मे २०२१ रोजी चक्रीवादळ तसेच वादळ किंवा अतिवृष्टी झाली नसून कोणत्याच प्रकारची पडझड झाली नाही. सदर तलाठी, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांचे दाखले उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), जिल्हा परिषद, अकोला यांनी सत्यप्रत केले आहे.
त्यामुळे खोटा पंचनामा करणे व पडलेला ग्रामपंचायत मलबा याचे संरक्षण करण्यास असमर्थ राहिल्याने सरपंच व सर्व सदस्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचे सिध्द होते. प्रतिवादी सरपंच यांनी आपल्या समर्थनार्थ कोणताही सबळ पुरावा या न्यायालयासमोर सादर केलेला नाही. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता, वर नमूद मुद्यांवरुन सरपंच व सर्व सदस्यांनी आपले कर्तव्यात कसूर करुन नियमबाहयता केली असल्याचे सिध्द होत असल्याने विभागीय आयुक्त, अमरावती यांनी पारित केलेल्या आदेशात हस्तक्षेप अथवा बदल किंवा रद्द करण्याचे आदेश आज न्यायालयाने दिलेत. या आदेशामधे विजयसिंग शंकरसिंग सोळंके, रा. कुटासा ता. अकोट जि. अकोला यांचे अपील मान्य करण्यात आली. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग यांनी प्रस्तुत प्रकरणी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्याचे आदेश, तसेच अनंता रघुनाथ लाखे, सरपंच ग्राम पंचायत, कुटासा ता. अकोट जि. अकोला व इतर सर्व सदस्यांना अपात्र करण्याचे आदेश ग्राम विकास मंत्रालय, मुंबई तर्फे देण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांना पुन्हा एकदा चांगलाच धक्का बसला आहे
0 टिप्पण्या