भारत जोडो यात्रेची अकोलात आढावा बैठक
आज अकोला शहरात काँग्रेसचे दिग्गज नेत्यांचे आगमन झाले. यामध्ये बाळासाहेब थोरात, नितीन राऊत व यशोमती ठाकूर यांनी आज अकोल्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पदयात्रे संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी या यात्रेचे आयोजन व नियोजन करण्यात आले. भारत जोडो ही पदयात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. केरळ आणि कर्नाटक मधून ती यशस्वीपणे पार पडली आहे. भारतीय नागरिकांनी त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे. पुढेही पदयात्रा आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार आहे. बंधुभाव मानवधर्माचे सूत्र घेऊन ही पदयात्रा सुरू झाली आहे. केरळ आणि कर्नाटक मधून प्रचंड प्रतिसाद या पदयात्रेला मिळाला आहे. संपूर्ण जगात मानवतेचा संदेश देण्याचे काम काँग्रेस नेते राहुल गांधी करीत आहेत. महाराष्ट्रामध्ये नांदेड येथून प्रथम प्रवेश होऊन पदयात्रेला सुरुवात होणार आहे. याचे संपूर्ण नियोजन काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये होत आहे. महाराष्ट्रातही जनतेचा भारत जोडो यात्रेसाठी उत्साह दिसून येत आहे. अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे नियोजन चांगल्या प्रकारे होत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पदयात्रा अकोला शहरामधून जात असल्यामुळे त्याचे संपूर्ण नियोजन या सभेमध्ये करण्यात आले. राहुल गांधी यांची पदयात्रा ही लोकशाही बळकट करण्यासाठी असून यामध्ये सर्व भारतीय जनतेने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
काँग्रेसचा अध्यक्ष यावर चर्चा, म्हणजेच काँग्रेसला महत्त्व आहे
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी असणार, अशी चर्चा जोर धरत असते. परंतु विरोधी पक्ष नेते यावर नेहमीच चर्चा करताना दिसतात, अशा विषयावर चर्चा होणे ही उल्लेखनीय बाब आहे. कारण कुठल्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्ष निवडीवर कधीही चर्चा होताना आजपर्यंत दिसले नाही, परंतु काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण यावर नेहमीच चर्चा होताना पहावयास मिळते. त्यामुळे निश्चितच काँग्रेस पक्षाला महत्त्व आहे असे मत यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिले. देशाचे भविष्य घडविणारा काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस अध्यक्षांवर अशा प्रकारची चर्चा होणारच आहे, हे विशेष.
शिवाजी पार्कवर ज्यांचा दसरा मेळावा, तिच खरी शिवसेना
शिवाजी पार्क वर दसरा मेळावा होतो आहे. तीच खरी शिवसेना, शेवटी उध्दवजींची शिवसेना आपला दसरा मेळावा मोठा करण्यासाठी स्वतः समर्थ आहेत. आम्ही घटक पक्षात होतो एकमेकांना चांगली साथही दिली. असे वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. नक्कीच दसरा मेळावा हा अतिशय यशस्वीपणे व भरगच्च असा शिवसैनिकासमक्ष सभा पार पडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांना धमकी, काँग्रेसला काळजी, कायदा व सुव्यवस्था धोक्यात
मुख्यमंत्री यांना धमकी असं आतापर्यंत कधी घडलं नव्हतं यावरून यांची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. राज्यात शांतता व सुव्यवस्थेवर राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे यावरून लक्षात येते आहे. त्यामुळे या सरकारचे नियंत्रण नसल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी सरकार वर केली आहे.
Balasaheb Thorat on CM Threat
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या