डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा रखडलेला लाभ लवकरात लवकर विद्यार्थ्यांना मिळावा
सत्र २०२०-२१ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले असता पात्र यादीमध्ये त्यांचे नाव सुद्धा आले असून परंतु त्यांना अजून स्वाधार योजनेचा लाभ मिळालेला नाही खेड्यापाड्यातील विद्यार्थी व विद्यार्थिनीना या योजनेच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळत असते व या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी शिक्षणासाठी इच्छुक असतात परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती ढासाळलेली असते अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ होतो परंतु गेल्या काही महिन्यापासून विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागामध्ये जाऊन चौकशी करत असताना त्यांना उडवा उडवी चे उत्तर तेथील अधिकाऱ्यांच्या वतीने मिळत होती.
दिनांक 3 ऑक्टोंबर 2022 रोजी या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन ग्रामीण ग्रामीण भागामधून शहरी भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी पुढाकार घेऊन आपल्या अकोला जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी साहेब मा. संजयजी खडसे साहेब यांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन या योजनेचा विद्यार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळो यासाठी पुढाकार घेतला व लगेच मा.संजयजी खडसे साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या समोर समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांना फोन लावून विद्यार्थ्यांना दिलासा दिला व लवकरात लवकर या योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांना मिळणार असा त्यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला त्यावेळी उपस्थित विद्यार्थी नागेश गवई, आदर्श वाहूरवाघ, रत्नदीप तायडे, राहुल खाडे, निलेश तोरणे,अजय सरदार, केतन दामोदर, यश शिरसाट, पवन वानखडे,मुकेश हातोले, सचिन तायडे, संगम हातोले पंजाब हातोले, व इतर विद्यार्थी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या