अकोला ते अकोट रेल्वे तात्काळ सुरू करा- आमदार रणधीर सावरकर
अकोला-
अकोट अकोला शटल रेल्वे सुरू करा तसेच अमरावती अकोला बुलढाणा तसेच मेळघाट परिसरातील शेतकरी ना शेतमाल आंध्र प्रदेश तसेच योग्य बाजारपेठ मध्ये विकता यावा यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रहाची मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रेभाजपा प्रदेश , सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.
अकोट रस्त्यावरील गांधीग्राम गावा जवळील पूर्णा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल दिनांक 18.10.2022 रोजी अचानक कोसळण्याची भीती निर्माण झाल्यामुळे वाहतुकी साठी धोकादायक बनला आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी, अकोला यांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
अकोला-अकोट रस्त्यावरील पूर्णा नदीवरील जुन्या पुलाला पर्यायी पूल बांधण्याचे काम शासनाने हाती घेतले असून नदीपात्रावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या पुलाच्या पोच मार्गाचे बांधकाम भुसंपादना अभावी रखडल्याने हा पूल वाहतुकीसाठी कीमान वर्ष भर तरी सुरू होऊ शकत नाही. यासाठी संपूर्ण व्यवस्था सह अकोट अकोला शटल बस तसेच अकोटला दक्षिण भारत आणि उत्तर भारत व मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या संबंधी व्यवस्था करण्याच्या मागणी आज आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना मुंबई येथे जाऊन अधिकाऱ्यांची चर्चा करून अकोला जिल्ह्यातील व अकोला बुलढाणा वाशिम अमरावती या जिल्ह्यातील प्रवाशांच्या समस्या प्रखरपणे मांडल्या.
अकोला-अकोट हा मार्ग आंध्रप्रदेश व मध्यप्रदेशाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावरील प्रचंड वाहतूक लक्षात घेता ज्या इतर पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे ते मार्ग खूप अरुंद, वेळ खाऊ तसेच गैरसोयीचे आहेत शिवाय प्रसंगी वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास कोंडी सोडणे अवघड होउ शकते. तसेच अंतर वाढत असल्याने लोकांना जास्त भाडे मोजावे लागणार आहे. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त असून सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याच्या दृष्टीने ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रहाची मागणी आमदार सावरकर यांनी केली. खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या वतीने रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या आमदार सावरकर यांनी मांडल्या व खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या प्रयत्नाने
अकोला-अकोट रेल्वे ब्रॉडगेजचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे आणि 2 वर्षांपूर्वी या मार्गावर ट्रायल रन सुद्धा यशस्वीरित्या घेण्यात आली होती, वरील सर्व परीस्थिती लक्षात घेता अकोला-अकोट या रेल्वे मार्गावर रेल्वे शटल सेवा सुरू करणे हा एक मात्र पर्याय आहे, सदर मार्गावर दररोज कीमान ७-८ प्रवासी रेल्वे सेवा सुरू केल्यास प्रवासी वाहतूक आटोक्यात येईल. अशीही अशीही आमदार सावरकर यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या वतीने रेल्वेमंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांच्याकडे मागणी केली. अकोला-अकोट रेल्वे मार्गावर लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी संबंधितांना अत्यंत तातडीने सुचना द्याव्यात, करीता विनंती आहे, निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून आमदार सावरकर यांनी केली आहे.
0 टिप्पण्या