Ticker

6/recent/ticker-posts

एकाच दिवशी दोन विद्यार्थांनी संपवली आपली जीवन यात्रा

एकाच दिवशी दोन विद्यार्थांनी संपवली आपली जीवन यात्रा  


अकोला :  राज्यात नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. अकोल्यामध्ये एकाच दिवशी दोन नीट परीक्षेमध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी आपली जीवन यात्रा संपविण्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या घटनेत नीट परीक्षेत चांगले गुण न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या चैताली दिलीप विटे (१९), रा. अंत्री, ता. बाळापूर येथील युवतीने गुरुवारी सकाळी भाड्याच्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली

अकोल्यात दुसऱ्यां प्रयत्नात सुध्दा नीट परीक्षेच्या निकालात अपेक्षाप्रमाणे गुण पडले नाही. त्यामुळेच सकाळी मोठ्या पुलाखाली सापडलेल्या मृतदेह घटनेतील उघडकीस आलेली तरुणीने टोकाचा निर्णय घेतला आहे. या तरुणीला सुद्धा अपेक्षाप्रमाणे नीट परीक्षेत गुण प्राप्त त्यांना झाल्यामुळे तणावात तिने हा निर्णय घेतल्याचा आहे समजत आहे. परंतु अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी आपली जीवन यात्रा संपविणे हे आपल्या जीवनातील यशाचा मार्ग नव्हे, विद्यार्थ्यांनी आपल्याला यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे व सकारात्मक विचार ठेवणे आजच्या पिढीला असणे फार आवश्यक झाले आहे.


मृत तरुणीचे नाव रोहिणी विलास देशमुख वय २२ वर्ष असुन, अकोला शहरातील मोठा पुलाखाली असलेल्या मोर्णा नदीच्या पुलावरुन उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. रोहीणीला निट परीक्षेत ३५० पर्यंत गुण मिळाले होते. यावेळी दुसऱ्या प्रयत्नात नीट परीक्षेच्या निकालात तिला ४२० गुण मिळाले. खुल्या प्रवर्गात ५६५ च्यावर गुणाची अवशक्ता होती. मात्र, अपेक्षाप्रमाणे तिला कमी गुण पड़ल्याने ती तणावात होती. रोहिणीचे वडील राजस्थान मध्ये राहतात. ती तिच्या मामाकडे अकोल्यात राहायची, वडिलांसह कुटुंबाचं रोहिणीला डॉक्टर बनवायचं स्वप्न होतं. मात्र, तिला नीट परीक्षेत यश आले नाही. वैद्यकीय क्षेत्रात काम करत बेटी बचाव या उपक्रमांतर्गत तिला अनेक काम करायचेही स्वप्न होती. डॉक्टर बनून तिला रुग्णांची सेवा करायची होती. परंतु, आता तिचे हे स्वप्न अधुरेच राहिले.


डाकी रोड परिसरात आपल्या मामाच्या इथे राहते. काल रात्री रोहिणीने आपल्या कुटुंबासोबत जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले असता. आज पहाटे ती उठुन ह्या तणावातूनच तिने टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे कुटुंबांला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अंत्रीच्या युवतीने घेतला गळफास

नीट परीक्षेत चांगले गुण न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या चैताली दिलीप विटे (१९), रा. अंत्री, ता. बाळापूर येथील युवतीने गुरुवारी सकाळी भाड्याच्या रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अंन्री येथील चैताली भिवटे ही वर्षभरापासून गोकुळ कॉलनीतील द्वारकानगरीत एका प्राध्यापकाच्या घरी भाड्याने रूम करून राहत होती. याठिकाणी ती नीट परीक्षेचा अभ्यास करायची. बुधवारी नीट परीक्षेचा निकाल लागला; परंतु यात चैतालीला चांगले गुण मिळाले नाहीत. त्यामुळे खिन्न झालेल्या चैतालीने रूममधील छताला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्याच्या मुलीच्या सांगण्यानुसार चैतालीला नीट परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने, ती चिंतेत होती.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या