पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह
अकोला गेल्या वीस वर्षात प्रशासकीय अनुभवाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश विकासाचा आराखडा तयार करून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून दिला आईचा आशीर्वाद व हिंदू संस्कृतीचा जतन व सर्वांच्या भावना जाणून सर्व क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प घेऊन गेल्या आठ वर्षात नवभारत निर्माण महत्त्वपूर्ण योगदान निर्माण करून प्रत्येकाचा कौतुक करणे मन की बात मध्ये चांगल्या कामाचा गौरव करणे चांगल्या कामाचा जाहीर स्वरूपात अभिनंदन करणे यासाठी मोठे मन लागते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासासंदर्भात व देशाप्रती असलेली सदभावना यावरून सिद्ध होत आहे त्यांचा वाढदिवस व राष्ट्रपिता गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह मध्ये स्वच्छता आरोग्य शिबिर, रक्तदान तसेच समाजाला अपेक्षित सेवा करण्याचा संकल्प अकोला जिल्हा भाजपाने खासदार संजय भाऊ धोत्रे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर व सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्याचा निर्णय हा समाजाप्रती असलेली समर्पण भावना असल्याची प्रतिपादन सेवा सप्ताह संयोजक व भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी केले.
स्थानिक भाजपा कार्यालयात अकोला जिल्हा भाजपा ग्रामीण जिल्हा कार्यकारणी व तालुका पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत ते बोलत होते भाजपा महानगर अध्यक्षविजय अग्रवाल हे अध्यक्षस्थानी होते. मंचावर शिवाजीराव देशमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी कुसुम भगत, केशव ताथोड, विजयसिंह गहीलोत, माधव मानकर, रामदास तायडे शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे., गजानन उंबरकर अशोक गावंडे भूषण कोकाटे रितेश समाजकर महादेवराव काकड गणेश तायडे सुनील नावकार, जयश्री फुंडकर, सुनिता जाधव, अमोल साबळे, महेंद्र पेजावार गजानन उंबरकर, अशोक गावंडे कनकोटक अनिल गासे मोहन पारधी अक्षय जोशी उमेश पवार श्रीकृष्ण मोरे खेडे, मचीत राव पोहरे रवीगावडे, जयंत मसने, मोनीका ताई गावंडे, महेंद्र गोयंका अभिजीत गहीलोत, बाळासाहेब नेरकर अब्रार खान पुरुषोत्तम चौखडे राजू नागमते सजय गोटफोडे मंचावर विराजमान होते.
भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सोबत समाजाच्या शेवटच्या घटकाची सेवा करण्यासाठी गेल्या सात दशकात कार्यरत असून त्याग तपस्या बलिदान सेवा समर्पण च्या माध्यमातून सत्ता हे साधन नव्हे तर साध्य समजून कार्य करून देशाला सुजलाम सुफलाम व महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून कार्यरत असून 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत महानगर व जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम समाजाला अभिप्रेत कार्य करणार असल्याची घोषणा करून 16 जणांकडे समिती गठित करून आमदार हरीश पिंपळे संयोजकाची जबाबदारी देऊन विजय अग्रवाल यांनी जिल्हाध्यक्ष रणधीर भाऊ सावरकर यांच्या वतीने विविध जबाबदारीचे वाटप जाहीर केले कार्यक्रमात शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती तसेच बी,बी. लाल यांच्या दुखद निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच वाराणसी येथील ज्ञान व्यापी मंदिर, गौरी शृंगार मंदिर दरबार जिल्हा न्यायालयाचा निकालाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आला. तसेच श्रीराम जन्मभूमी न्यास समिती तर्फे 14 जानेवारी 2024 रामलीला मंदिर जनतेसाठी खुले करण्याची घोषणेचा स्वागत करण्यात आला यावेळी गिरीश जोशी अक्षय जोशी यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन रमेश आप्पा खोबरे, प्रास्ताविकमाधव मानकर, प्रदर्शन केशव ताथोड यांनी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या