Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी जबाब द्या!

शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी  जबाब द्या!                     

अमरावती-
डाॅ.पंजाबराव उर्फ भाऊ साहेब देशमुख ; भारताचे माजी कृषिमंत्री व त्यांनी स्थापण केलेल्या व संस्थापक अध्यक्ष राहिलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक दि. 11  सप्टेंबर रोजी होत आहे.ही संस्था म्हणजे भाउसाहेबांनी काढलेली दूभत्या गाई म्हशींची डेअरी झाली. अध्यक्ष;पदाधिकारी व संचालकांनी लोणी व साय खाण्याचे काम करीत असल्याचे जाणवते. भाऊ साहेब देशाचे कृषिमंत्री होते;शेतकय्रांंचे विकास व उत्थानाचे त्यांनी कार्य केले. शेतकय्रांचे मुलांनी या संस्थेतून शिकावे; नोकय्रा कराव्यात व शेतकय्रांना मदत करावी;उत्थान करावे;ही अपेक्षा होती.आज गेल्या 25 वर्षापासून विदर्भातील हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत.दूर्दशेमधे जगत आहेत.भारताचे कृषिमंत्री राहिलेल्या त्यांच्या  वऱ्हाड  सोन्याची कराड होती;त्याची दूरवस्था झाली. कर्मभूमी विदर्भामध्ये आज दररोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत.ते थांबविण्याकरीता संदर्भामध्ये ह्या आत्महत्या बंद व्हाव्यात याकरीता शिवाजी शिक्षण संस्थेने कोणतेही पाउल उचलल्याचे ऐकिवात नाही. भाऊसाहेबांचे तेच खरे मुख्य कार्य आहे;या संदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या बंद व्हाव्यात व त्यांना ऊर्जितावस्था यावी ;समर्थपणे सन्मानाने उभा रहावा याकरता भाउसाहेब प्रेमी व अभिमान वाटणाय्रा शेतकरी सूपूत्रांनी;पुढे होउन साडेचार वर्षांपूर्वी शेतकरी बचाओ आंदोलनाची बैठक घेउन पुढाकार घेण्याचे ठरविले व  डॉ. पंजाबराव देशमुख  यांचे नावे एक शेतकरी जागरण अभियान राबवण्याचा निर्णय घेतला; या अभियाना करता शश्री शिवाजी शिक्षण संस्थेने प्रत्यक्ष विविध प्रकारची मदत करावी अशी अपेक्षा ठेवून अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांना पत्र लिहिले व ते पत्र सचिव श्री शेषराव खाडे यांच्याकडे दिले त्यांनी वाचून अतिशय आनंद व्यक्त केला व अवश्य मदत करू;आश्वासित केले;त्याची प्रत प्रत्यक्ष हर्षवर्धन देशमुख अध्यक्ष यांच्याकडे पाठवण्यात आली व त्यांना फोन करून सहभागी होण्याचे  आवाहन करण्यात आले.त्यामधे अभियाना करीता  कार्यालयास जागा;खोली व साहित्य व पत्र व्यवहारासाठी स्टेशनरी आदि साहित्य पुरविण्यास व स्वत: व संस्थेतील कर्मचाय्रांना आवाहन करणे;सुचना करण्याचे आवाहन केले होते.परंतु साडेचार वर्षांमध्ये हर्षवर्धन देशमुख; अध्यक्षाकडून साधे त्याचे उत्तर देण्याचे सौजन्य व जबाबदारपणा दाखवता आला नाही; डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कार्याविषयी अध्यक्षांना किती आत्मियता आहे हे यावरून निदर्शनास येते. शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष व पदाधिकाय््राना चरण्याचे कुरण भाउ साहेबां नी उभे केले असे समजत आहेत; भाउसाहेबांचे  जीवन उद्दिष्टाची ही उपेक्षा आहे. प्रगती पॅनेल ला निवडून द्यावे ते श्री.वसंतराव धोत्रे; यापूर्वीचे अध्यक्ष यांचा वैचारिक  वारसा चालवणारे  दाखविण्याचा प्रयास असावा. धोत्रे हे शेतकर्याप्रती उदार होते;दखल घेत होते;त्यांना कुणीही  सूचना पत्र पाठवले तर; जातीने लक्ष्य देत;उत्तरे देत;सुधारणा करीतळ; व ती पत्रे सर्व सदस्यांना दाखवत व समितीमध्ये कार्यकारणी मध्ये ठेवत होते; येत होते भाऊसाहेब प्रेमी मंडळीच्या प्रती त्यांना आत्मियता होती;भान असायचे; परंतु सध्याचे अध्यक्ष यांना याची जाण व भान नाही; एककल्ली हुकूमशाही पद्धतीने अध्यक्षांचा हा कारभार सुरू आहे;असे निदर्शनास येते. 


भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या शिवाजी शिक्षण संस्थेत शिकून गेलेल्यांनी; आस्था व प्रेम असलेल्या लाखो विद्यार्थी व भाऊसाहेब प्रेमी आहे व त्या सर्वांनी ही आपली संस्था आहे व त्याबद्दलचा जबाब कार्यकारिणीस विचारला व तो पाळणे योग्य वाटत नसेल त्यांनी पदाधिकारी राहू नये.  पदाधिकारी संस्थेचे मालक नसून केवळ चालक आहेत; हे लक्षात ठेवावे. सध्याचे  बेजबाबदार शेतकरीद्रोही अध्यक्षास पुन्हा निवडून का द्यावे; त्यांची कुणाशी बांधिलकी आहे याचे उत्तर आजीवन सदस्यासह सर्वांनी शोधावे व द्यावे; जाहीर आवाहन ;भाई रजनीकांत;संयोजक; डा. पंजाबराव देशमुख शेतकरी जागरण अभियान व श्री डॉ.एन.एम.के.मुरके; माजी कार्यकारणी सदस्य व आजीवन सदस्य;तसेच अनेक शिवाजी संस्थेचे आजीवन सदस्य व भाऊसाहेब प्रेमी जाहीरपणे विचारीत आहेत.             

निवेदनकर्ता-
डा.एन.के.एम.मुरके;मो.नं.9422918853 अमरावती.दि.9.9.2022


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या