Ticker

6/recent/ticker-posts

 स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना कार्यालयात ध्वजारोहण 


भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना कार्यालयात साजरा केलेल्या देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिन सोहळयात कॉम्रेड रमेश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले...!

अकोला दि. १५.०८.२०२२ स्थानीक जुने शहर स्थित भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना कार्यालयात ७५ व्या स्वातंत्र सोहळा अमृत महोत्सव वर्ष निमित्त सर्व प्रथम राष्ट्रिय ध्वजरोहन कॉ. रमेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यालयात सभा घेवुन उपस्थिताना मार्गदर्शन करताना कॉ. रमेश गायकवाड म्हणाले की भारत स्वतंत्र व्हावा या आंदोलनात युद्धात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटनेचे त्यांचे नेते कार्यकते अग्रस्थानी होते.

सर्व धर्म समभाव टिकवण्याचे काम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भारतात व जगात केला आहे. १९४७ अगोदर लंदन व भारत येथे सुद्धा भारत स्वतंत्र व्हावा म्हणुन कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांनी आंदोलने मोर्चे काढुन आपल्या जीवाची आहुती देवून आहेत अनेक पक्षाचे कार्यकर्ते भारत व गोवा मुक्ती आंदोलन युद्धात बलिदान दिले आहे हे विसरता कामा नये म्हणुन या आझाद भारतात जे जाती जातीत तेढ निर्माण करुण विष कालु पाहत आहे त्यांना त्यांची जागा दाखवून वेळ आल्यास कॉ. गोविंद पानसरे यांच्या सारखे बलिदाना साठी तयार रहा असा संदेश उपस्थिताना दिला..! नंतर कॉम्रेड नयन गायकवाड़ म्हणाले की, 
स्वातंत्र्य मिळाले मात्र आज मूलभूत गरजा जनतेच्या पूर्ण झाल्या नाहीत यासाठी संघर्ष करावा लागेल.!


आज आपण व भारतीय जनता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अतिशय आनंदाने साजरा करीत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी रात्री १२ वाजेपासून दुपार पर्यन्त राष्ट्रगीते म्हणत होती. स्वातंत्र्य चळवळीत निरोप देण्यासाठी पत्रक वाटणे गाणे म्हणत होते. मात्र महात्मा गांधी यांचा खून जातीयवादी शक्तींनी केला. याचे दुःख वाटते. भारत पाकिस्तान फाळणी वेदनादायक आहे. आज ही देशात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. देशातील शेतकरी, कामगार, श्रमिकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सुटतील तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळाले असे होईल. त्यासाठी लढावे लागेल. देशात राष्ट्रीय एकात्मता ,भारतीय संविधान मूल्य जपले गेले पाहिजेत. यासाठी लढाई करू असा संकल्प आजच्या दिवशी उपस्थिनांनी कॉम्रेड नयन गायकवाड यांच्या सह करुण स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.!


ध्वजारोहण व सभेत कॉ. रमेश गायकवाड, कॉ. रामदास ठाकरे, कॉ. नयन गायकवाड, कॉ. शुभम बाळापूरे, कॉ. छाया वारके, कॉ. सविता प्रधान, कॉ. रामा इंगळे, कॉ. प्रीती नायसे, कॉ. दिपा निमजे, कॉ. राधा वाघमारे, कॉ. विद्या घायवट, कॉ. प्रतीभा वानखडे, कॉ. प्रीती श्रीवास, सुमित्रा वानखडे, कॉ. वैशाली गुळधे, कॉ. सीमा गवई, कॉ. सिला शिरसाट, कॉ. अल्का चोपडे, कॉ. नेहा तायडे, कॉ. सुमित्रा वानखडे, कॉ. सुवर्णा घोडेस्वार, कॉ. जयश्री गवई, कॉ. अर्चना नागमोते, कॉ. तबस्सुम जमीन सह अनेक पक्ष व जनसंघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते..! असे कॉ. सुनीता पाटिल आपल्या प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळवीतात..!



भगवान रविदास कम्युनिटी फेडरेशन


स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव
    आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी ९.३० वाजता श्री निरंजनजी गव्हाळे यांचे निवास्थानी खेडकर नगर अकोला येथे भगवान रविदास कम्युनिटी फेडरेशन अकोला यांच्यावतीने स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला या दरम्यान राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीताने सुरवात करण्यात आली.
   

    स्वतंत्र प्राप्ती करिता ज्या देशवासियांनी, वीर पुरुषांनी बलीदान दिले त्या शहीदांचे या क्षणी स्मरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रामुख्याने खालील समाजबांधव उपस्थित होते श्रीमान मधुकर वानेडकर साहेब , मधुसूदन गव्हाळे,बाबुराव चंदनकार, महादेव गवई ,ओंकार चिमणकर, किशोर शेगोकार, मेघशामजी ठोसरे, महादेव कळसकर, श्रीरामजी राखोंडे, महादेव इंगळे, गौरव गव्हाळे, भीमराव अंबाडकर ,लक्ष्मणराव पद्मणे, निरंजनजी गव्हाळे, नरहरी राजगुरू, कीशोर राजगुरू, विष्णू वाडेकर, प्रकाशजी चापके, नागोरावजी गव्हाळे तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
      अल्पोपहार व चहापाणीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


मुख्य संपादक प्राध्यापक पी एस थोरात बातमी व जाहिरातीसाठी संपर्क नंबर9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या