सामाजिक क्षेत्रात कार्यरत वसंत बाछुका भुसावल डिव्हिजन मधून रेल्वे सल्लागार समितीत निवड
अकोला सुप्रसिद्ध उद्योजक व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत वसंत बाछुका भुसावल डिव्हिजन मधून रेल्वे सल्लागार समिती मुंबई सदस्य म्हणून प्रचंड बहुमताने त्यांची निवड झाली भारतीय जनता पक्षाच्या खासदार संजय भाऊ धोत्रे यांचे विश्वासू व त्यांनी रेल्वे संबंधी दिलेली जबाबदारी सतत वीस वर्षांपासून यशस्वी कार्यरत राहून रेल्वे प्रवाशांच्या समस्या दूर करण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील राहतात तसेच उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी व भुसावळ डिव्हिजन मध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील राहतात त्यांना अग्रवाल समाजाच्या अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे धार्मिक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत असणाऱ्या बाछुका रेल्वे प्रवाशांच्या समस्या व अकोला रेल्वे स्टेशनवर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त करून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे
अकोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम जनतेच्या कल्याणसाठी सातत्याने कार्यरत असून कोविड-19 च्या काळात लसीकरणासोबत धान्य वाटप केले आता बारा वर्षे ते 59 वर्षापर्यंत वर्षापर्यंत प्रथम डोस आणि दुसरा डोस घेणाऱ्यांना बूस्टर डोस आज दिनांक 15 जुलै शुक्रवारपासून सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजता पर्यंत नागरिक आरोग्य केंद्र कृषी नगर मनपा शाळा क्रमांक 22 कृषी नगर शासकीय राजकीय महाविद्यालय नागरिक केंद्र आरोग्य केंद्र खदान भरती हॉस्पिटल कस्तुरबा हॉस्पिटल नागरिक आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट नागरिक आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना नागरिक आयोग्य केंद्र हरिहर पेठ नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजीनगर शिवसेना वसाहत नागरिक आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प आदर्श कॉलनी सोळा नंबर शाळा नागरी आरोग्य केंद्र उमरी येथे काय तसेच आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 15 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत वयोगटातील अठरा वर्षांत वरील सर्व लाभार्थींना मोफत शासनापासून उपलब्ध आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल संतोष पांडे एडवोकेट देवाशिष काकड निलेश निनोरे अमोल गोगे गणेश अंधारे राजेंद्र गिरी, संजय जीरापुरे संजय गोडा संजय गोडफोडे अक्षय गंगाखेडकर डॉक्टर विनोद बोर्डे डॉक्टर अभयजैन डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर अमित कावरे डॉक्टर प्रशांत अग्रवाल डॉक्टर योगेश शाहू उमेश गुजर चंदा शर्मा धनंजय धबाले सुधीर रादड, आदींनी केली आहे
अकोला आणीबाणी मध्ये बंदिस्त राजकीय काळासाठी जेलमध्ये गेले होते त्यांना गौरव सन्मान योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली होती परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने ती योजना बंद केली होती ती योजना पुन्हा सुरू करून आणीबाणी मध्ये बंदिस्त ना सन्मान करण्याच्या साठी ती योजना पूर्ण पुन्हा सुरू करण्याचा घेतल्याबद्दल जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल पंडितराव कुलकर्णी सिद्धेश्वर देशमुख पुरुषोत्तम खोत, बोडके, नारायण पंचभाई , स्मिताताई कायंदे स्मिताताई राजनकर एडवोकेट विजयराव देशमुख आदींनी सरकारचे अभिनंदन आभार व्यक्त केले आहे
अकोला सर्वसामान्याला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी स्थापित झालेली भाजपा शिवसेना महायुती राज्य सरकार , एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखालील सरकार सरकारने शब्दाला जगून पेट्रोल वर पाच तर डिझेलवर तीन रुपये कमी करून स्वस्त केले आहे. ग्रामपंचायत सरपंच व नगरपालिका नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला व नियमित कर्ज खेळणाऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा इतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी स्वागत केले आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने व महाराष्ट्राला सुजलाम करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमाणे भौगोलिक सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्राचा विकास करण्याच्या महाराष्ट्राला करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे
पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप :
माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
यांच्या कारकिर्दीची चौकशी हवी!
भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सावरकर माजी महापौर विजय अग्रवाल यांची केंद्र सरकारकडे मागणी
काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या महिला पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अकोला आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. अन्सारी यांच्यावरील वादग्रस्त आरोपांवर काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल म्हणाले.
सन २००७ ते २०१७ या काळात हमीद अन्सारी हे देशाचे उपराष्ट्रपती होते. याच काळात त्यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार या नात्याने दौरे करताना भारतातील महत्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळविल्याचा गंभीर गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने केला आहे. एकदा दोनदा नव्हे,तर तब्बल पाच वेळा अन्सारी यांनी वेगवेगळ्या निमित्ताने मिर्झा यांना भारतात निमंत्रित केले होते. या भेटीत मिळविलेली माहिती आपण आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीला पुरवत होतो, असे मिर्झा यांनी म्हटले आहे. भारताच्या प्रत्येक शहरात पाकिस्तानी गुप्तहेरांचे जाळे पसरले असल्याचेही मिर्झा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे, मिर्झा आणि हमीद अन्सारी यांच्यातील संबंधांचा खुलासा होणे जरूरीचे असून त्यासाठी अन्सारी यांची चौकशी केली जावी अशी मागणी अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली. इराणचे राजदूत म्हणूनदेखील अन्सारी यांची कारकिर्द संशयास्पद असल्याचा आरोप केला जात असून देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता या आरोपांची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपतीपदावर नेमणूक करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचीदेखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही आमदार सावरकर अग्रवाल यांनी केली.
देशाच्या सुरक्षिततेस बाधा येऊ शकेल अशी माहिती शत्रूराष्ट्रास पुरविण्याचा आरोप घटनात्मक पदावरील व्यक्तीवर होणे ही चिंताजनक बाब असल्याने अन्सारी यांच्या संपूर्ण कारकिर्दीची चौकशी करून केंद्र सरकारने सत्य उजेडात आणले पाहिजे. तसेच त्या वेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने अन्सारी यांच्या नेमणुकीमागील भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही आमदार रणधीर सावरकर भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल म्हणाले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या