Ticker

6/recent/ticker-posts

गुरु पौर्णिमा! कृतज्ञता पौर्णिमा!

गुरु पौर्णिमा! कृतज्ञता पौर्णिमा!


     जगामध्ये बुद्ध उत्पन्न होणे, सुखकारक आहे, असे धम्मपदात म्हटले आहे. बुद्ध उत्पन्न होण्यामुळे जगाचे कल्याण होते. वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गोतमांनी अनुत्तर सम्यक संबोधी प्राप्त केली. हा बुद्धांचा जन्म होय. त्यांना जे ज्ञान अवगत झाले, ते इतरांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी गयेतून वाराणसीकडे गेले. सारनाथ येथील ऋषीपत्तन येथे आषाढी पौर्णिमेला त्यांनी पाच परिव्राजकांना आपल्याला प्राप्त झालेल्या बोधीचे ज्ञान सांगीतले. त्या ज्ञानाला धम्म म्हटले जाते. त्यांनी जो उपदेश केला, तो 'धम्मचक्कपवत्तन' या नावाने विख्यात आहे. दु:ख नाहीसे होऊ शकते, याची घोषणा तथागतांनी या दिवशी केली. जगाला सर्वप्रथम हा आशावाद देणारे तथागत खर्‍या अर्थाने लोकगुरु बनले. म्हणूनच त्यांच्या गुणांचे वर्णन करताना त्यांना 'सत्था देवमनुस्सानं' असे म्हटले जाते. सत्था म्हणजे शिक्षक होय. देव आणि मनुष्यांचे शिक्षक म्हणजे तथागत बुद्ध होय. तृष्णेच्या कारणाने जगामध्ये दु:ख उत्पन्न होते. तृष्णेचा त्याग करण्याची पद्धती त्यांनी सांगीतले. प्रज्ञा शील समाधीची त्रिविध शिकवण प्रसारीत केली. त्यालाच अरिय अष्टांगिक मार्ग म्हटले जाते. 
     ज्ञान देणारी पौर्णिमा असल्याने गुरुपौर्णिमा आणि त्या बोधीज्ञानाचे दान दिल्याबद्दल कृतज्ञता पौर्णिमा म्हणून आषाढी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी तथागत बुद्धांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुया. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आपणांला शिकवले, शहाणे केले, नवे काही तरी सांगीतले अशा लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुया. त्यांचे अनुकरण करुन आपणही इतरांपर्यंत ज्ञान पोचवूया.
     आपणा सर्वांना या मंगलदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या