एससी विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण ५०० जागा साठी शिष्यवृत्ती लागू करणे आणि अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणे बाबत आज युवा आघाडी च्या वतीने आयुक्त,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पुणे ह्यांना निवेदन सादर.
पुणे दि. ७ - अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती ७५ जागांमध्ये वाढ करून २०२२-२३ ला ५०० जागा साठी शिष्यवृत्ती लागू करणे आणि अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणे बाबत आज युवा आघाडी च्या वतीने आयुक्त,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पुणे, महाराष्ट्र ह्यांना प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
वंचित बहूजन युवा आघाडीचे वतीने मागणी करण्यात आले की, आपण गेल्या वर्षी कोवीडच्या कारणामुळे राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या ७५ जागा आणि त्यात मागणी केलेल्या व वाढवलेल्या ५० जागेसंदर्भात आश्वासन दिले होते. मात्र दिनांक २४/५/२२ ला आलेल्या जाहिराती मध्ये जागा करिता शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचे स्पष्ट होते.सबब शिष्यवृत्ती आकडा केवळ ७५ आहे त्यात वाढ झाली नाही.आपल्या ५० जागावाढीची त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्याचप्रमाणे आपणच २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती करीता २०० जागा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची सुद्धा या वर्षीच्या जाहिरातीमध्ये अंमलबजावणी झाली नाही. सध्या महाराष्ट्रा मधून जवळपास बरेच विद्यार्थी गोरगरीब, कष्टकरी, मजूर यांची मुले उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. परंतु जागांची कमतरता असल्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही.प्रतीक्षा यादीत असलेल्या विध्यार्थ्यांना देखील संधी मिळत नाही.परिणामी परदेशी उच्च शिक्षण हे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना वाघिणीचे दुर्मिळ असलेले दूध ठरत आहे.सबब त्यामध्ये वाढ करून ५०० जागा उपलब्ध करुन द्याव्यात.
सामाजिक न्याय विभागा कडून ट्युशन फीसच्या विलंबामुळे आपण UNSW AUSTRALIA सारख्या विद्यापीठाला या शिष्यवृत्ती मधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.USNW Australia या नामांकित विद्यापीठाचे आपल्या असंख्य विद्यार्थ्यांना ऑफर लेटर आलेले आहे, त्यामुळे आपण या विद्यापीठासंदर्भात सकारात्मक पुनर्विचार करावा अशी वंचित बहुजन युवा आघाडी आपनास मागणी करतो की, आपण या ७५ जागांमध्ये याच वर्षी त्वरित वाढ करून ५०० जागांची सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घ्यावा.आणि या संदर्भातला शासन निर्णय तातडीने काढावा. त्यामुळे आपण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल.अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे सोईचे होईल. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य त्या वेळी त्यांची शिष्यवृत्ती, त्यांच्या अकाउंटमध्ये किंवा युनिव्हर्सिटीची फी त्यांच्या अकाउंटमध्ये वेळेवर पोहोचणे बाबत खूप मोठया प्रमाणात तक्रारी आहेत.अगदी जाहिराती प्रकाशित करण्यापासून त्यात जुन्या तारखा टाकून जाहिराती प्रकाशित होतात.अथवा तारखाचे रकाने मोकळे सोडून जाहिराती प्रकाशित होतात.परिणामी एकाच जाहिराती साठी सुधारित जाहिराती टाकली जाते.त्यावर सामाजिक न्याय विभागाचा निधी नाहक खर्च होतो.
परदेशी विद्यापीठात प्रवेश पुढील महिन्यात सुरू होत आहेत.शिष्यवृत्ती साठी मात्र २२ जुन २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.त्यामुळे अनेक विध्यार्थी कंसेंट लेटर घेऊ शकत नाही.त्यामुळे अर्ज मागविण्याची मुदत १५ जुलै २०२२ करण्यात यावी, अशी युवा आघाडीची मागणी केली आहे.
शिष्यवृत्ती वेळेत प्राप्तीसाठी SOP करण्यात यावी अशी देखील आमची मागणी आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाच्या काळामध्ये विद्यापीठांकडून कुठल्याच प्रकारचा मानसिक त्रास या संदर्भामध्ये दिला जाणार नाही व ते योग्य रीतीने आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
आपण लवकरच यावर निर्णय घेऊन अनुसूचित जातीच्या विध्यार्थी ह्यांचे संख्येत वाढ करावी असेही निवेदनात नमूद केले आहे.त्याची प्रत ना. धनंजय मुंडे,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुंबई, महाराष्ट्र ह्यांना पाठविण्यात आले आहे.आयुक्त दौऱ्यावर असल्याने त्याचे पीए ने निवेदन स्विकारले ह्यावेळी वंचितचे राजेंद्र पातोडे,प्रदेश महासचिव
वंचित बहूजन युवा आघाडी,महाराष्ट्र प्रदेश,अक्षय बनसोडे,प्रदेश सदस्य,ऋषिकेश नांगरे पाटील,प्रदेश सदस्य,विशाल गवळी,प्रदेश सदस्य,एड अफरोज मुल्ला प्रदेश सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या