Ticker

6/recent/ticker-posts

गुरु रविदास महाराज संदेश रथ यात्रेचे स्वागत

गुरु रविदास महाराज संदेश रथ यात्रेचे स्वागत



अकोला: दि. ०३/०५/२०२२ रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चांभारगडा वरून दि. 14 एप्रिल २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पासून संपूर्ण महाराष्ट्रभर संत रविदास महाराज यांचे मानवतावादी आणि समतावादी विचार व संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी गुरू रविदास महाराज संदेश रथयात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे. सुरुवातीला ही रथयात्रा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्यानंतर विदर्भामध्ये असे करून अकोला जिल्हामध्ये आल्या नंतर त्याचे स्वागत अकोला शहरातील बी आर सी एफ तसेच संपूर्ण समाजबांधवांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे मोठी उमरी अकोला येथील संत रविदास महाराज समाज मंदिर परिसरात संदेश रथयात्रेचे स्वागत, प्रबोधनाचा व सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोठी उमरी येथील प्रतिष्ठित व ज्येष्ठ समाज बांधव अरुणराव परोडकर हे होते, तर यांच्या संकल्पनेतून संदेश रथयात्रेचे आयोजन व नियोजन करण्यात आले असे अशोक लहाने हे प्रमुख पाहुणे होते. सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती मध्ये गजानन पद्मने, डॉ. कल्याणीताई पद्मने, प्रशांतभाऊ भटकर, प्रा. धनंजय खिराडे सर उपस्थित होते. सर्वप्रथम उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळी व समाज बांधवांच्या वतीने संदेश रथयात्रेचे स्वागत करण्यात आले तसेच संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर वानेडकर यांनी केले. त्यानंतर अशोक लहाने यांच्यासोबत आलेले बाळासाहेब पाटेकर, लखन काजळे, प्रवीण हनवते, राहुल सोनवणे, दीपक इंचाळ, प्रेमसागर खरात, विष्णू वाघमारे, अमोल साबळे या समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमामध्ये गजानन पद्मने, डॉ. कल्याणीताई पद्मने, प्रशांत भाऊ भटकर आणि प्रा. धनंजय खिराडे सर यांनी मार्गदर्शन केले. यांच्या मार्गदर्शनातून समाजाला आव्हान करण्यात आली की, समाजावर होणार्‍या अन्याय अत्याचाराला विरोध करण्यासाठी तसेच समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून कार्य करण्याकरिता आपण सर्व एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करावं यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. त्यानंतर या संदेश रथयात्रेचे प्रमुख अशोक लहाने यांनी समाज प्रबोधन करीत असताना सांगितले की, संत रविदास महाराज यांच्या विचार व संदेशाचे मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार हा पंजाब व हरियाणा मध्ये होते. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला जाणीव झाली की, या राज्यांमध्ये संत रविदास महाराजांच्या विचार व संदेशाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होऊ शकतो, तर आपल्या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये का नाही. या उद्देशाने आणि संत रविदास महाराजांचे विचार समाजाच्या हिताच्या व कल्याणाकरिता आहेत, तसेच समतावादी व मानवतावादी आहेत हे समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा कार्य आपल्याला करायचं असेल तर गुरु रविदास महाराज संदेश यात्रेचे आयोजन करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे मी समाजाला आव्हान करून सदर रथयात्रेचे १४ एप्रिल २०२२ पासून चांभार गड येथून सुरुवात करून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या संदेश रथाचा समारोप दि. २९/०५/२०२२ रोजी पुणे येथील तीसरे धर्मस्थळ/तीर्थस्थळ कात्रज येथे होणार आहे. यानंतर पुन्हा पुढील वर्षी अशाच प्रकारे रथयात्रा करून समाज प्रबोधनाचे कार्य करणार, त्यांनी आपल्या भाषणामध्ये पुढे असेही सांगितले की, भारतातील 16 संशोधक यांनी संत रविदास महाराजांच्या वर संशोधन करून भारत सरकारला त्यांचे संशोधन सादर केले आणि भारत सरकार यांनी सदर संशोधनाला मान्यता दिली. तसेच त्यांनी इतर विषयावर सखोल मार्गदर्शन करून उपस्थित असलेला समाज बांधवांचे प्रबोधन केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणराव परोडकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता समाजाने संघटित होऊन समाजाच्या हिताचे कार्य करणे गरजेचे आहे. तसेच या संदेश रथयात्रे प्रमाणे आपणही संत रविदास महाराजांचे विचारांचा प्रचार व प्रसार समाजापर्यंत कशा पद्धतीने करू शकतो याचे नियोजन सुद्धा करणे गरजेचे आहे. जर समाजाच्या हिताचा विचार करायचा असेल तर संत रविदास महाराजांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यांच्या या विचारांवर आपण खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने आपल्याला जो हक्क व अधिकार दिला त्याचे सरंक्षण करण्यासाठी समाजाने सदैव जागृत राहणे आवश्यक आहे. असे त्यांनी समाज बांधवांना आव्हान केले.
या कार्यक्रमाला समाजातील ज्ञानेश्वर पद्मने, रामदास शेगोकार, हिंमतराव शेगोकार, प्रकाशभाऊ ठोंबरे, गजानन पद्मने, महादेव इंगळे, सारंगधर डाखोडे, श्रीराम राखोंडे, हिम्मतराव वाडेकर, गजानन काकडे, नरहरी राजगुरू, काशीराम उंबरकार, मधुकर वानरे, गजानन चंदन, श्यामसुंदर पानझाडे, शिवलाल इंगळे, नाजुकराव डांगे, अविनाश गव्हाळे, अनील इंगळे, राजेश परोडकर, रमेश भटकर, विष्णू वाडेकर, राजेश चिंचोळकर, संतोष इंगळे, प्रवीण हनवते, राहुल सोनवणे, सौ. सुनिता शेगोकार, सायली शेगोकार, सौ. हिराबाई उमरकर, सौ. वंदना पद्मने, अॅड. सपना गव्हाळे, सौ. सखुताई वानेडकर, कु. पायाल तुंबळे, निरंजन गव्हाळे, श्रीराम इंगळे, सौ. लता परोडकर, गजानन राखोंडे आणि मधुकर दावेदार इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.
गुरू रविदास महाराज संदेश रथयात्रेचे स्वागत तसेच प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शेषराव गव्हाळे यांनी केले तर, आभार प्रदर्शन गजानन काकडे यांनी केले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या