Ticker

6/recent/ticker-posts

यावर्षी विद्यार्थ्यांसाठी पायभूत 'सेतू' अभ्यासक्रम

यावर्षी विद्यार्थ्यांसाठी पायभूत 'सेतू' अभ्यासक्रम


औरंगाबाद-  कोरोनामुळे सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदादेखील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'सेतू' अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची उजळणी घेण्यात येणार असून नवीन शैक्षणिक वर्षात जून महिन्यात त्यानंतर चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती विद्या प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनामुळे दोन वर्षांत शाळा कधी ऑनलाइन तर कधी ऑफलाइन सुरु राहिल्या. त्यामुळे दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य झाले नाही. अर्धवट मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्यात आले. विद्यार्थी पुढील वर्गात गेले असले तरी विविध विषयांमधील महत्त्वाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तसेच मागील घटकांमधील संकल्पनांची उजळणी करण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती 'डायट'च्या माध्यमातून विद्या प्राधिकरण स्तरावर सुरू आहे.


सेतू अभ्यासक्रमाचा फायदा



ॲन्ड्रॉईड फोन, इंटरनेटची अपुरी सुविधा यांमुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रमाचा चांगला फायदा होणार आहे. राज्यातील दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी नव्याने सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात येत असून, तो शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस संपूर्ण एक महिना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या