वीज वितरण कंपनीने भारनियमनाचे चा आदेश परत घ्यावा
अकोला
जागतिक स्तरावर अकोला जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तापमान उच्चांक सर्वात जास्त असताना सरकारच्या नाकारते पणामुळे देशात कुठेही भारनियमन असताना महाराष्ट्रात आघाडी सरकार सर्वसामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या दृष्टीने उन्हाळ्यात रात्री आणि दिवसाचा भार नियम लादण्याचा पाप करून जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा व केंद्र सरकारला बदनाम करण्याचा कुटील डाव व आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी अशा प्रकारचा प्रसार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सरकार करीत असल्याचा आरोप अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी करून वीज वितरण कंपनीने भारनियमनाचे चा आदेश परत घेऊन सर्वसामान्य नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्रास देण्याचा उद्योग करू नये अन्यथा जनता जनार्दन रस्त्यावर आल्यास त्याचे परिणाम शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला भोगावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
जागतिक स्तरावर अकोला जिल्हा आठवा क्रमांक चा तापमान मध्ये असताना रात्री बारा ते पाच व दुपारी 12 ते पाच पर्यंतचा भार नियम घोषित कर करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने जाहीर केला आहे सध्या उन्हाळ्याच्या दिवसात शहराच्या विविध भागांमध्ये डास सुळसुळाट असते. तसेच तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सरकार आपले अपयश लपवण्यासाठी तसेच भ्रष्टाचारापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीने हा एक नवीन उद्योग सुरू केला आहे. पुरेसा कोळसा असताना गुजरात सरकारने वीस उपलब्ध करून देण्याची हमी दिल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार का करण्यात येत आहे असा सवाल भाजपा आमदार सावरकर भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार वसंत खंडेलवाल यांनी उपस्थित केला आहे शासनाने त्वरित भारनियमनाचा आदेश परत घ्यावा व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा भाजपातर्फे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे
0 टिप्पण्या