प्रचंड महागाईने खाजगी चाकरमाने हवालदिल . . ?
कारंजा : रशिया युक्रेन युद्धामुळे, महागाई वाढणार अशी नुसती हाळ उठली . आणि ज्या वस्तूंचा विदेशी युद्धाशी किंवा विदेशातून पुरवण्याशी नावानेही संबंध नाही . अशा किरकोळ वस्तूंची सुद्धा दरवाढ सुरु झाली . पेट्रोल - डिझेल - स्वयंपाकाचे गॅस तर महागलेच महागले . परंतु स्वदेशी उत्पादनाच्या जीवनावश्यक सुध्दा महागणे सुरु झाले .आणि याचा नेमका फटका, हातावर पोट असणाऱ्या, दररोज धाऊन मजूरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चाकरमान्यांना, निराधार - बेसहारा, दारिद्रयरेषेखालील अंत्योदय लाभार्थ्यांना बसणार असून, येत्या काळात त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागणार असल्याचे दिसून येत आहे .
तरी शासनाने वेळीच परिस्थिती हाताळून जर जीवनावश्यक महागाई रोखण्यात यश मिळविले नाही तर अन्नधान्याच्या किमंतीची परिस्थिती अन्नधान्याच्या महागाई बाबत लवकरच पाकिस्थान सारखी होईल असे महागाईबाबतचे पुढचे भाकित समाजसेवक संजय कडोळे यांनी माध्यमांशी बोलतांना, आज कारंजा येथे बोलून दाखवीले असून आता शासनाने हातावर पोट असणाऱ्या सर्व चाकरमान्याचा , दारिद्रय रेषेखालील लोकांचा, निराधार - बेसहारा लोकांचा म्हणजेच कामगार - मजूरांचा सुद्धा विचार करून त्यांना शासनाच्या रास्त धान्य दुकानातून सर्व खाण्यापिण्याच्या जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य, तेल ,दूध मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे .
0 टिप्पण्या