डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती साठी जाचक अटीमुळे वंचित राहिलेल्या १०९ संशोधक विध्यार्थ्यांची तात्काळ फेलोशिप मंजूर करावी- राजेंद्र पतोडे, वंचीत
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने मागणी करण्यात आली की , डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-२०१९) आणि २०२०) ची निवड यादी जाहीर करण्यात आली होती .या निवड यादी मध्ये ५०९ विद्यार्थ्यांपैकी केवळ ४०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.१०९ विद्यार्थ्यांना या अधिछात्रवृती पासून वंचित ठेवले आहे.२०१९-२० या वर्षासाठी बार्टी संस्थेने एमफील व पिएचडी च्या ४०० विद्याथ्यीची फेलोशिप साठी निवड केली आहे. NIRF Rankings मूळे महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, नागपूर व इतर काही विद्यापीठांचे १०९ विद्यार्थी गुणवत्ता असूनही फेलोशिप पासून वंचित राहिले आहेत.
बार्टी संस्थेच्या धर्तीवर निर्माण झालेल्या सारथी व महाज्योती सारख्या संस्था केवळ कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या सर्वच विद्यार्थ्याना फेलोशिप देत आहे.बार्टी संस्था ह्या विद्यार्थ्यांना एवढ्या जाचक अटी लावुन त्यांना वंचित ठेवत आहे.लेखी परीक्षा, मुलाखत या प्रक्रियेत गुणवत्ता प्राप्त करून देखील कमी जागेमूळे सदर विद्यार्थी फेलोशिप पासुन जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहेत. हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
बार्टी संस्थेच्या धर्तीवर राज्यात सारथी आणि महाज्योती या दोन संस्थांची स्थापना दोन्ही संस्था परिपूर्ण कागदपत्रांच्या आधार सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देत आहे.त्यामुळे विद्यार्थी हिताचा असा निर्णय बार्टी संस्था घेत नाही.बार्टी संस्था महाराष्ट्र राज्यात आहे की पाकिस्तान मध्ये ? असे तुघलकी निर्णय घेतले जाणे कितपत योग्य आहे ? हा वंचित युवा आघाडी चा सवाल आहे.
संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या कडे वारंवार निवेदना द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRE-२०१९ आणि २०२०) सर्व ५०९ विद्यार्थ्यांचे कागदपत्रे पडताळणी करून हि अधिछात्रवृत्ती देण्याची मागणी केली आहे.मात्र बार्टी ने या मागणी मान्य केल्या नाही.परिणामी विद्यार्थ्यांनी दि. १७/२/२०२२ पासून बार्टी कार्यलया समोर आमरण उपोषण केले होते. त्या वर सरसकट सर्व विद्यार्थ्यांची निवड करणेबाबत विद्यार्थ्यांनी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने शासन स्तरावरून मार्गदर्शन व उचित कार्यवाहीस्तव विनंती केल्याचा पत्राची प्रत अपर मुख्य सचिव,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई ह्यांना दिनांक १८/२/२२ रोजी पाठविली गेली.त्याची प्रत विद्यार्थ्यांना देऊन त्यांची बोळवण करीत आंदोलनापासून परावृत्त करण्यात आले होते.कागदी घोडे नाचविण्या पलीकडे बार्टी प्रशासन काही धोरणात्मक निर्णय घेतांना दिसत नाही.त्यामुळे सदर विध्यार्थी पुन्हा आर्जव आणि विनंत्या करीत आहेत.
अश्या पद्धतीने बार्टीचा कारभार चालणे आम्हाला मान्य नाही.शासनाच्या वतीने चालणाऱ्या सर्व संस्थाना सारखे नियम आणि निकष असले पाहिजे.सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर बार्टीने प्रवेश दिलेच पाहिजे.
हा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात यावा. पुन्हा विध्यार्थी उपोषण करणार असतील तर त्याला वंचित बहुजन युवा आघाडी चा पाठिंबा राहील. या आठवड्यात हा प्रश्न तडीस न केल्यास युवा आघाडी बार्टी विरुद्ध संघर्ष करण्यास बार्टी मध्ये दाखल होईल, त्यामुळे उदभवणा-या परिस्थिती साठी सामाजिक न्याय मंत्रालय आणि बार्टी प्रशासन जबाबदार राहील. ह्याची नोंद घेऊन १०९ विद्यार्थ्यांची फेलोशिप मंजूर करावी. असे वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागीय मा. अपर मुख्य सचिव,मंत्रालय, मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे येथील मा. महासंचालक यांना निवेदनातून कळविले आहे.
0 टिप्पण्या