गांव झाडुन काढणे हीच खरी गाडगेबाबांना आदरांजली-महादेवराव भुईभार
अकोला-भुकेलेल्याले भोजन,तहानलेल्याची तृषातृप्ती,गरिबांना मदत,गुराढोरांना पाणी पाजा,मुलाबाळांना शिक्षण द्या आणि आपले गाव झाडून स्वच्छ ठेवा हीच गाडगेबाबांना खरी आदरांजली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी केले.
समाजसंत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त देशमुखपेठेतील संत गाडगेबाबा पुतळा परिसर सफाईप्रसंगी बोलत होते.राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.संजय तिडके,एस. डी .परघरमोल,बापु देशमुख,विद्या राणे,किशोर मिश्रा,देवानंद शिरसाट यांचेसह देशमुखपेठेतील नागरीक व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देशमुखपेठ,शेलारफैल,तारफैल परिसरात साफसफाई अभियान राबविले . ऋषीकेश निमकंडे व आकाश इंगळे यांनी साफसफाई अभियानाचे संयोजन केले
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने वैज्ञानिक दृष्टी दिली
—प्रा. दिगंबर कट्यारे
अकोला-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही वैज्ञानिक जाणिवा जागविणारी चळवळ आहे.या चळवळीने वैज्ञानिक दृष्टी दिली असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.दिगंबर कट्यारे यांनी केले.
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार आरोग्य मंदिर येथे आयोजित संविधान संवाद कार्यक्रमात बोलत होते.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविणे व संविधान जागर करण्यासाठी सेवानिवृत्तीनंतरचा पूर्णवेळ देत आहे.या चळवळीला ग्रामीण भागात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हीच कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा असल्याचे त्यांनी कथन केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने वैज्ञानिक दृष्टीकोन जाणिव जागृतीसाठी पूर्णवेळ देणारे जळगांवखांदेश चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे यांचा अकोला आगमनप्रसंगी डाॅ.गोवर्धनदादा खवले व योगप्रचारक चंद्रकांत अवचार यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार,राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड,प्रा.शिवाजीराव चव्हाण, प्रा. मोहन खडसे ,विलास ठाकरे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन आकाश इंगळे यांनी केले.आम्ही प्रकाशबीजे रुजवित चाललो । वाटा नव्या युगाच्या तुडवित चाललो।।
या प्रेरणागीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या