नाबार्डच्या शेतकरी सुलभ कर्ज योजनेत सुधारणा करा
——————————————
सर्वोदय व शेतकरी शिष्टमंडळाचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
——————————————
अकोला-अनेक वर्षापासुन शेतकरी सुलभ कर्ज पुरवठा शेती व शेतकरी बांधवांसाठी पुरक नसल्याने शेतकरी दुष्टचक्र वाढले आहे.शेतकरी बांधवांसाठी नाबार्डने केसीसी योजनेत सुधारणा करावी अशा मागणीचे निवेदन जिल्ह्यातील शेतकर्याचे शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मा.संजय खडसे यांना दिले. ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार,निंबी मालोकार सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुधाकरराव पाटील ,सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड,सर्वोदय किसान मंचाचे संजय मालोकार,युवा कार्यकर्ते विजय तायडे,काटीपाटी बॅरेजचे अध्यक्ष किशोरभाई मिश्रा यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
गेल्या अनेक वर्षापासुन निंबी मालोकार येथील शेतकरी बांधवांनी गावात आंदोलन,साखळी उपोषण करुन ही मागणी शासन दरबारी रेटुन धरली आहे.या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषण करणार होते.परंतु ओमीक्राॅन च्या संकटामुळे तुर्तास उपोषण स्थगीत करुन या मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री,महसुलमंत्री,पालकमंत्री व सर्वपक्षीय आमदारांकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करणार असल्याची माहिती सुधाकरराव पाटील यांनी दिली .
शेतमालास स्थानिक बाजारपेठेत उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावा,सहज सुलभ कोणताही खर्च नसलेले वित्तीय सहाय्य उपलब्ध व्हावे,कृषी पतपुरवठा सोसायटीचे पीक कर्ज ३१मार्चपूर्वी भरण्याची सक्ती नसावी,पीक कर्जावर मिळणारे व्याज सवलत राष्ट्रीयीकृत बँकेप्रमाणे सरळ केसीसी खात्यात जमा करावे,पीक कर्जाप्रमाणे इतर मुदती कर्जावर देखील व्याज अनुदान मिळावे,दरवर्षी शासनमान्य एकाच विमा कंपनीमार्फत विमा काढावा,कर्जमाफीऐवजी कायमस्वरुपी अनुदान मिळावे,जिल्हा बँकेच्या माध्यमातुन प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थाद्वारे शेतकर्यांना दिलेल्या सर्वप्रकारच्या कर्जखात्याचे मिरर अकाऊंटींग असावे या मागण्यासाठी यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा इषारा या शिष्टमंडळाने दिला आहे.
0 टिप्पण्या