शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र आयुष्यभर जोपासणारा शिवशाहीर हरपला - खासदार संजय धोत्रे
अकोला
शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने शिवचरित्राचा संदर्भ ग्रंथ हरपल्याची शोकभावना माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी व्यक्त केली आहे.
शिवशाहीर हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर लाखोंच्या जनसमुदायाला शिवचरित्राची मोहिनी घालणारे श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे कायम स्मरणात राहतील.शिवाजी महाराज हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेबांनी आयुष्यभर जपला आणि या मंत्राच्या सहाय्याने *वन्ही तो चेतवावा , चेतविता चेततो* या समर्थ वचनाला साक्षी ठेवत मराठी मनाची मरगळ बाबासाहेबांनी दूर केली. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रचंड श्रद्धा हे बाबासाहेबांचे बलस्थान . या बलस्थानाच्या बळावर त्यांनी महाराष्ट्रासह अवघे विश्व जिंकले.
नुकतीच वयाची शंभरी पूर्ण करणारे बाबासाहेब आमचा मानबिंदू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्राची अपरिमित हानी झाल्याची शोकभावना . खासदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली आहे. अकोल्यात त्यांचा सा नित्य मार्गदर्शक दर्शनाचा लाभ मिळाला महान व्यक्ती महत्त्व निघून गेल्यामुळे फार मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली.
समाज निर्माण होतात व नवीन पिढीला मार्गदर्शक बाळासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली अशा शब्दात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात पद्माकर मोरे, काजल राऊत आदींनी सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
0 टिप्पण्या