कावीळ संदर्भात समाजात जनजागरण आवश्यक -डॉ. आशीष तापडिय
अकोला -भारतात कावीळ या आजाराने ग्रस्त असलेल्यांची संख्या अफाट आहे.कावीळ या रोगावर योग्य उपचार नाही झालेत तर रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. म्हणून कावीळ हे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक असून या संदर्भात समाजात जनजागरण आवश्यक असल्याचे मत अकोला येथील प्रख्यात पोट आणि लिवर विकार् तज्ञ डॉ. आशीष तापडिया यांनी व्यक्त केले.
शनिवारी स्थानीय हॉटेल सिटी प्राइड सभागृहात जागतिक कावीळ दिना निमित्त कावीळ जनजागरण संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.आशीष तापडिया यांनी कावीळ या रोगाची माहिती दिली.
कावीळ म्हणजे यकृतावर होणारी सूज होय. या सुजेला कारणीभूत असलेले आतापर्यंत पाच प्रकारचे व्हायरस ओळखण्यात आले आहेत. या सर्वांमध्ये "हेपेटाइटिस बी" आणि "हेपेटाइटिस सी" हा वायरस जास्त महत्त्वपूर्ण असून या व्हायरसची लागण झालेले रुग्ण सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि यापैकी "हिपॅटायटीस बी" यावर औषधे उपलब्ध असली तरी निरंतर लसीकरण उपचार योग्य उपाय आहेत. तसेच टक्केवारी नुसार "हिपॅटायटीस बी-2-5%" व "हिपॅटायटीस सी-1-2%" असल्याचे मत डॉ. आशीष तापडिया यांनी यावेळी व्यक्त केले.
कावीळ रोगांची लक्षणे प्रथम रुग्णांना समजत नाहीत. त्यामुळे रुग्ण या आजाराने बाधित आहे की नाही हे कळत नाही. हळूहळू मात्र या विषाणूच्या प्रभावाने यकृतावर सूज निर्माण होऊन त्यातील पेशी नष्ट होऊन यकृत कडक होते.रुग्णांच्या लक्षात येईपर्यंत त्यातील अर्ध्याहून अधिक विकृत पेशी नष्ट होऊन त्याची कार्यक्षमता कमी होत असल्याचे डॉ.आशीष तापडिया यांनी सांगून यावर " हिपॅटायटीस बी" साटि या लसीकरणाची बचावासाठी अधिक गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हिपॅटायटीस अर्थात कावीळ या विषाणूची लागण झाली की नाही हे फक्त रक्त तपासणीद्वारे रुग्णाला कळू शकते.या रोगाची कारणे निरनिराळी असली तरी घरातील कोणालाही या रोगाची बाधा झाली असल्यास, असुरक्षित यौन संबंध,बाधित व्यक्तीचे रक्त घेतले असल्यास,या विषाणूने बाधित सुईने इंजेक्शन दिल्यास,टॅटू अर्थात गोंदण करून घेतल्यावर,संक्रमण झाल्यास,दूषित पाणी पिल्यास हा रोग होऊ शकतो.
या रोगाची लक्षणे याची माहिती देताना डॉ. आशीष तापडिया म्हणाले,भूक न लागणे,अशक्तपणा,पिवळेपणा,लघवी पिवळी होणे ही या काविळीची प्राथमिक लक्षणे असून या रोगाची अंतिम पातळी म्हणजे यकृताचा कर्करोग आहे. निदान होईपर्यंत यकृत अर्ध्याहून अधिक निकामी होऊन कर्करोग होऊ शकतो.यावर यकृत प्रत्यारोपण हा एकमेव उपाय या घातक रोगावर असून जो लाखांपैकी एखाद्या रुग्णाला शक्य असतो.कावीळ अर्थात हेपेटायटिस हे पाच प्रकारची असली तरी यातील महत्त्वाचे बी व सी दोन हेपिटायटीस गंभीर व महत्त्वाचे आहेत.यातील प्रथम "हेपेटायटिस बी" हे असून दुसरे हेपेटायटिस सी होय. "हिपॅटायटीस बी" हा प्रकार फार गंभीर आहे.या दोन्ही प्रकारातील रुग्णांची लक्षणे ही काही प्रमाणात सारखी असली तरी हेपेटाइटिस सी मध्ये ताप,थकवा, डोकेदुखी, भूक न लागणे,मळमळणे,पोटदुखी,लघवी गडद होणे,मातकट रंगाची विष्ठा आदी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात.
हेपेटाइटिस सी मध्ये शंभर पैकी 75 जणांमध्ये दीर्घकालीन जुनाट संसर्ग विकसित होतो.जुनाट हेपेटाइटिस सी असलेले 75 पैकी 20 रुग्ण खूप आजारी किंवा आजारी पडत असतात.म्हणून प्रभावी उपाययोजना या रोगापासून रुग्णाला वाचू शकतात असेही यावेळी सांगण्यात आले.
मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या