शांतीवन अमृततीर्थ सजल विहिरी येथे श्रींच्या प्रकट दिन उत्सवास प्रारंभ...
▪️श्रीमद् भागवत कथा कीर्तन सप्ताह सुरू
▪️श्रींना छप्पनभोग नैवेद्य अर्पण
▪️गुरुवार तिथीवर श्रींच्या भक्तांची अलोट गर्दी
प्रतीनीधी- संतोष माने
अकोटः संत गजानन महाराजांच्या कृपाप्रसादाने पवित्र झालेल्या ऊर्जादायी, शांत, निसर्ग सानिध्यातील श्री. संत गजानन महाराज संस्थान शांतीवन अमृत तीर्थ सजल विहीर अकोली जहागीर- अकोलखेड येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवास गुरुवार दि.13 फेब्रुवारी पासून श्री भक्तांच्या गर्दीत उत्साहात प्रारंभ झाला. श्रींच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त ह भ प श्री केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथेस प्रथम दिवशी प्रारंभ झाला तर भव्य कीर्तन महोत्सव देखील यावेळी पार पडत आहे. पुढील आठ दिवस प्रगट दिन उत्सवाअंतर्गत सजल विहीर येथे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
यावेळी श्रीमद् भागवत कथेचे पहिले पुष्प गुंफतांना ह भ प केशव महाराज उखळीकर उपदेश करतांना म्हणाले तहान भागवण्यासाठी पाणीच लागतं पाण्याविना जिवंत राहणं कठीण आहे म्हणूनच पाण्याला जीवन म्हटलंय योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद संत गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी लावत विहीर सजल केली. , श्रींच्या पवित्र स्थळी ही कथा पार पडत आहे.पुढे बोलतांना ते म्हणाले चार वेद अठरा पुराणाचं सार म्हणजे भागवत कथा होय. चार वेद म्हणजे जणू गाय आहे तर गाईच्या दुधाचे पूर्ण रूप जसे तूप असते तसेच ज्ञानाचे पूर्ण रूप ही भागवत कथा आहे असा आशयाचे कथा विवेचन त्यांनी प्रथम पुष्पात केले. कथेच्या पहिल्या पुष्पाची सांगता संत गजानन महाराज व श्रीमद् भागवत कथा आरतीने झाली.
▪️श्रींना छप्पन भोग व महाप्रसाद अर्पण....
श्रींच्या प्रकट दिन उत्सवाच्या प्रथम दिवशी गुरुवार तिथी आल्याने सकाळपासूनच पायदळ वारी करत अनेक श्रीभक्त विहिरी वर पोहोचले होते तर भक्तांद्वारा श्रींना यावेळी भव्य छप्पनभोग प्रसाद अर्पण करण्यात आला तसेच यावेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दुपारपर्यंत मंदिर संस्थान द्वारा भव्य महाप्रसाद वितरण सुरूच होते तर प्रगट दिनाच्या उत्सवापर्यंत दररोज या ठिकाणी भव्य महाप्रसाद वितरण भाविकांच्या सेवेत असेच सुरू राहणार असल्याचे विश्वस्तांनी यावेळी सांगितले.
▪️दैनंदिन कार्यक्रमातून भक्ती आनंद...
श्रींच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त सजल विहीर येथे दैनंदिन कार्यक्रम पार पडत आहेत यामध्ये सकाळी ५.३० ते ६.३० काकडा स ७ वाजता श्रींची आरती स.८ ते १० गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण स.११.३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद संध्या ५.३० ते ६.३० हरिपाठ तर रात्री ८ ते १० वाजेपर्यंत हरिनाम कीर्तन पार पडणार आहे
▪️नामवंत कीर्तनकारांची दररोज किर्तनं....
श्रींच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त कथामंडपात दररोज रात्री ८ ते १० वाजेपर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा पार पडत आहे पहिल्या दिवशी ह भ प विनोद महाराज देशमुख आळंदीकर यांचे कीर्तन पार पडणार आहे तर श्रींच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त यावेळी विहीर परिसराला प्रति पंढरीचे स्वरूप प्राप्त होत आहे.
0 टिप्पण्या