विधानसभा निवडणुकीमध्ये अपप्रचाराला बळी न पडता सावध राहण्याची गरज- आ. सावरकर
अकोला मातृशक्तीने पुन्हा हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आणून आशीर्वाद दिले तसेच महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये मातृशक्ती खंबीरपणे महायुतीला विजयी करणार तसेच सामाजिक व आर्थिक सबलीकरणासोबत मातृ शक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये सन्मानाचा आदराचा विकासाचा केंद्रबिंदू मानून समाज व देश प्रगतीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या मातृशक्तीला कर्तव्य म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तसेच 105 योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा जीवन उंचवण्याचा ऐतिहासिक निर्णय माय मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देऊन विदेशातील 17 भाषांमध्ये समावेश करून नवरात्राच्या पर्वावर 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेचा गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून माय मराठी भाषा देशात सर्वात जास्त तीन नंबरची भाषा बोलणारी असून या भाषेचा अभिजीत दर्जा देण्याची मागणी अनेक दिवसाची होती परंतु महाविकास आघाडी याकडे लक्ष देत नव्हतं परंतु स्वाभिमानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे बाबासाहेब आंबेडकर संत महात्म्यांच्या भूमिकेला मान्य करणाऱ्या अध्यात्म व नवरात्राच्या पर्वावर ऊर्जा आणि शक्ती देण्याचे काम सरकारने केले आहे आपण भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहून जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना ताकद द्या, व एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच देवा भाऊ समाजाच्या विकासासाठी पंचामृत बजेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत विज देऊन सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा मध्ये एसटीमध्ये सवलत देऊन सन्मान करण्याचा काम केला आहे अशा सरकारच्या पाठीशी परिवारासह व आपल्या इष्टमित्र सोबत आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अपप्रचाराला बळी न पडता महाविकास आघाडीतील तसेच भारिप पासून सावध राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
चिखलगाव सर्कल येथील माज रोड येथे लाडकी बहीण संवाद मिळाव्यात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर शंकरराव वाकोडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून समीक्षाताई धोत्रे मंजुषाताई सावरकर अंबादास उमाळे विठ्ठल चतरकर तेजराव थोरात रवी गावंडे राजेश ठाकरे महिला आघाडी तालुकाध्यक्ष मुक्ताबाई टाले सरपंच ज्योतीताई लोहूरकर कापसी रोडच्या सरपंच व जसं ते भाजपा काम करणाऱ्या वेणूताई उमाळे कापशी तलाव च्या सरपंच सुनीताताई चतुरकर खरब सरपंच हर्षद हर्षल गोडचवर चांगेफळ येथील सरपंच अंकुश इंगळे चव्हाण अक्षय जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित यावेळी समीक्षा ताई धोत्रे यांनी मातृशक्ती ही समाजाला दिशा देणारी व समाज सोबत परिवार राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणारी असून आधी सनातन काळापासून मातृ शक्तीला महत्त्व असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यामध्ये मातृ शक्तीचे महत्त्वपूर्ण योगदान असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व जागा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती मोठ्या संख्येने विजय होईल व भाजपाला टीका करणाऱ्याला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून समीक्षाताई धोत्रे यांनी विचार व्यक्त केले अंबादास उमाळे यांनी प्रास्ताविक केले तर राजेश ठाकरे यांनी संचालन केले मुक्ताबाई टाले यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी शंकरराव वाकोडे रवी गावंडे यांनी आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वात जास्त लाडकी बहीण योजना अकोला जिल्ह्यामध्ये राबवून ग्रामीण भाग व शहरी भागाला न्याय दिल्याचे सांगून आज सातत्याने 18 तास काम करणारा सामाजिक दायित्व लक्षात घेऊन करणारा लोकनेता हा आपल्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असल्याचा गौरव असल्याचे सांगितले
0 टिप्पण्या