हरभरा , गहू , सूर्यफुलासह ६ पिकांच्या हमीभावात घसघशीत वाढ
अकोला भाजपा यांनी मानले मोदी सरकारचे आभार, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय
अकोला
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत मोदी सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपसीड, मोहरी,मसूर, हरभरा, गहू,सूर्यफूल आणि बार्ली या पिकांच्या 'एमएसपी' मध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकरी हिताच्या या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल,जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, जयंत मसने तेजराव थोरात विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा,,. वैशाली निकम, दादाराव पेठे, श्रीकृष्ण मोरखडे, प्रभाकर मानकर अशोक राठोड,. मायाताई कावरे, अंबादास उमाळे राजेश बेले बळीराम सिरस्कार, शंकरराव वाकोडे, मधुकर पाटकर विजयसिंह सोळंके, सुमन ताई गावंडे, कुसुमताई भगत, गीतांजलीताई शेगोकार, रामदास तायडे आदींनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत.
. अकोला भाजपाने. यांनी पत्रकात म्हटले आहे की , केंद्र सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांचे हमीभाव नुकतेच घोषित केले आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत रेपसीड आणि मोहरीच्या एमएसपी मध्ये ३०० रु. तर मसूरच्या एमएसपी मध्ये २७५ रु. प्रति क्विंटल अशी घसघशीत वाढ करून शेतक-यांना दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे हरभरा पिकाच्या एमएसपी मध्ये 210, गहू 150, सूर्यफूल 140 आणि बार्ली पिकाच्या एमएसपी मध्ये 130 रु. प्रति क्विंटल वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पिकांच्या सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर एमएसपी निश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला अनुसरून या ६ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देऊन त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय , केंद्रातील एनडीए सरकारची शेतक-यांप्रति असलेली कटीबद्धता दर्शवते असेही भाजपाने प्रसिद्ध केलेल्या.. पत्रकात नमूद केले आहे.
0 टिप्पण्या