Ticker

6/recent/ticker-posts

महायुती सरकार कामगिरी दमदार...कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा मंजूर

महायुती सरकार कामगिरी दमदार...कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा मंजूर


अकोला
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी तसेच शेती व शेती पूरक व्यवसाय यांना चालना देण्यासाठी २०१४ ला मुख्यमंत्री असताना ना.देवेंद्र जी फडणवीस यांनी बदलत्या हवा हवामानाचा वेध लक्षात घेता हवामान अनुकूल शेती करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता, या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेती पूरक व्यवसाय व शेतकऱ्यांना शेती अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य देण्यात आले होते,या प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वी रित्या पार पडला होता.यात अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी मतदारसंघातील खारपाण पट्टा तिल समस्या लक्षात घेऊन या प्रकल्पासाठी सक्रिय पुढाकार घेतला होता, ग्रामीण भागात ही योजना प्रभावी पणे राबवली व या योजनेचा लाभ हजारो शेतकरी बांधवांना मिळाला.


नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा मंजूर करण्यासंदर्भात ही या प्रकल्पाचे तांत्रिक समितीचे सल्लागार आ.रणधीर भाऊ सावरकर यांनी शासन दरबारी पुनश्च पाठपुरावा केला होता तो टप्पा- २ मंजूर ही झाला होता पण हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आणि गावात चालवला पाहिजे याची निश्चिती करणे बाकी होते काल या बाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय होऊन जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या प्रकल्पात एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश-

यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर,बीड,जालना,परभणी,धाराशीव,लातूर, नांदेड,हिंगोली तर विदर्भातील अमरावती,अकोला,वाशिम,यवतमाळ,बुलढाणा,वर्धा,नागपूर,भंडारा,गोंदिया,चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित ६ हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे.


ग्रामविकासाची कास धरत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार,कृषिमंत्री धनंजय मुंडे व अकोला पूर्वचे आमदार तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य आमदार रणधीर सावरकर यांचे मनस्वी आभार!! पश्चिम विदर्भातील खार पानपट्टी शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत तसेच आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र उर्फ देवा भाऊ यांनी आमदार सावरकर यांना तांत्रिक संचालक म्हणून दोनदा निवड करून या योजनेचा लाभ विदर्भ विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र येथील शेतकऱ्यांना मिळून दिला 9 95 गावांना त्याचा लाभ मिळाला यासाठी अभ्यासू नेतृत्व आमदार सावरकर यांच्याकडे पाठवलेले त्यांनी सुचवलेल्या सूचना सरकारने पालन केलं कृषी संजीवनी नानाजी देशमुख योजना पार्ट टू म्हणून राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याचा योग्य तो पाऊल उचलला यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सर्वांना सोबत घेऊन 13 कोटी महाराष्ट्राच्या जनतेची चिंता करणारे संयमशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आभार व्यक्त करून आमदार सावरकर सातत्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा नेतृत्व असल्याचे कृतीने सिद्ध करत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व अभिनंदन केले आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या