पुरात वाहुन गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला चान्नी येथील ग्रामस्थ व पोलिसांच्या प्रयत्नाला यश
प्रतिनिधी नासीर शेख
पातुर तालुक्यातील चान्नी येथे विश्वमित्र नदीच्या पुरात महिला वाहून गेल्याची घटना, सोमवार दि.२ ऑगस्ट रोजीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली होती,महिलेला शोधण्यासाठी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे आपल्या ताफ्यासह व ग्रामस्थ शर्तीचे प्रयत्न करीत होते,अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून,३ ऑगस्ट रोजीच्या सकाळी चान्नी जवळ वाहुन गेलेल्या रुख्मीनाबाई दशरथ पवार यांचा मृतदेह आढळून आला, महिला चान्नी येथे विश्वमित्र नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेली असता,पाय घसरल्याने तोल पाण्यात गेला,आणि महिला पुरात वाहून गेली होती,ठाणेदार रवींद्र लांडे, पोलिस कर्मचारी सुधाकर करवते, सुदर्शन चवरे,उज्वला इटीवाले, स्वाती जाधव,यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले आहे.
या... ग्रामस्थांनी केले शर्तीचे प्रयत्न
चान्नी येथील संगीत बर्डे (महाराष्ट्र पोलीस), करण सोनोने(आर्मी), चंद्रकांत तायडे (मा. सरपंच) बळवंत घुगे, पवन बर्डे, मंगेश बर्डे(आर्मी),विशाल सरदार(आर्मी सुभाष घोरे(आर्मी),अजय पवार, श्रीकृष्ण ताले,संगीत घुगे, गौतम इंगळे , प्रकाश पवार,गजानन बर्डे शेषराव पवार,कैलास बर्डे, दिलीप अहिरे, विजय बर्डे राजु पवार, सचिन कांबळे, आदित्य ठोसरे,आदी ग्रामस्थ व पोलीसांनी महिलेचा मृतदेह शोधण्यास शर्तीचे प्रयत्न केले,
0 टिप्पण्या