देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, विरोध करत आहेत अपप्रचार - अमित शहा
अकोला
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद गेल्या १० वर्षांपासून सातत्याने वाढते आहे. आताही मोदी यांनी ४०० पार चा नारा दिला आहे. हे लक्ष देखील कठीण नाही, आपली ताकद कितीही वाढली तरी सत्तेचा दुरुपयोग करीत नाही. त्यामुळे आरक्षणास पात्र असणार्या एस.सी, एस.टी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण आम्ही कधी ही हटवणार नाही असे ठाम प्रतिपादन देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांनी केले.
अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा,शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, कुणबी सेना, रिपाई कवाडे गट, मराठा महासंघ मह्युतीचे उमेदवार अनुप संजय धोत्रे यांच्या विराट प्रचार सभेत गृह मंत्री अमित शाह बोलत होते. स्थानिक क्रिकेट क्लब मैदानावरील या विराट प्रचार सभेत बोलतांना अमित शाह पुढे म्हणाले की आम्ही आमच्या वाढत्या ताकदीचा उपयोग देशवासीयांच्या भल्या साठी व देश हितासाठी केला आहे. आमची ताकद वाढताच आम्ही भारतीय जनतेला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काश्मीर चे स्पेशल ३७० कलम हटविले. गेल्या ७० वर्षे कॉंग्रेस ने काश्मीरचा सांभाळ अनौवरस पुत्रा सारखा केला होता आम्ही काश्मीर प्रदेशाल्ला भारताचा कायदेशीर अविभाज्य भाग बनविला आहे. करोडो रामभक्तांच्या श्रध्येचा विजिंकलाचार करून आमच्या सरकारने कोर्टात राममंदिराची बाजू व्यवस्थितपणे मांडली व हा खटला आम्ही जिंकला आणि ठरल्याप्रमाणे अयोध्येला प्रभूश्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिर निर्माण केले. आमची ताकद वाढतच आम्ही या वाढलेल्या ताकदीने सी.ए.ए कायदा लागू केला अफगाणिस्थान, पाकीस्थान, बांगलादेश, या तिन्ही देशात तेथील हिंदू अल्पसंख्यांक समाजावर भीषण अत्याचार झाले. तेथील हिंदू, शीख, बौद्ध, जैन शरणार्थी भारताकडे म्हणजे आपल्या मायभूमीकडे आशेने पाहत होते. या सर्व निराश्रिताना भारताने सी.ए.ए कायद्याने आश्रय दिला. तेव्हा हा कायदा देश विरोधी कसा अशा प्रश्न मा. अमित शहा यांनी उपस्थित केला.
CAA ला 👆 धक्का लागू देणार नाही
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छात्रापती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगे महराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जय जयकाराने केली. जय श्रीराम नारेदेत त्यांनी या विराट सभे वातावरण प्रचंड उत्साहात बदलले. शाह यांचे भाषणापूर्वी पावसाचे आगमन झाले होते. पावसाची तमा न बाळगता हजारो श्रोते अमित शाह यांचे भाषण कान देऊन ऐकत होते. आपल्या प्रभावी व आक्रमक शैलीत बोलतांना अमित शाह यांनी राज्यातील नेते शरद पवार यांचेवर जोरदार टीका केली. शरद पवार हे दहा वर्षे यु.पी.ए सरकारमध्ये मंत्री होते तेव्हा या दहा वर्षात शरद पवारांनी व त्यांच्या यु.पी.ए ने महाराष्ट्राला काय दिले असा सवाल अमित शहा यांनी उपस्थित केला. सरकारी आकडेवारी नुसार पवार व यु.पी.ए ने महाराष्ट्राला दहा वर्षात 1 लाख ९१ हजार करोड दिले तर आमच्या मोदी सरकारने मावळत्या दहा वर्षात महाराष्ट्राला ७ लाख १५ हजार कोटी रुपये दिल्याचे शाह म्हणाले. आम्ही सत्तेत आलोतर देशातील सी.ए.ए कायदा रद्द करू असे आश्वासन कॉंग्रेस वाले एका समुदायाला देत आहेत. कॉंग्रेसच्या या विधानाचा शाह यांनी खरपूस समाचार घेतला. देशातील जनता व आम्ही कॉंग्रेसला कधीही सत्तेत येऊ देणार नाही त्यामुळे सी.ए.ए कायदा रद्द होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही असे शहा म्हणाले. कॉंग्रेसने मुस्लिमांकडे केवळ एक व्होट बँक म्हणून बघितले आहे, त्यांच्यातील अन्यायाला कधी ही वाचा फोडली नाही. आम्ही मात्र ट्रिपल तलाख पद्धत रद्द करून मुस्लीम स्त्रियांचा आशीर्वाद घेतला असे शाह म्हणाले. अकोल्यातील कावड यात्रा प्रसिद्ध आहे हा धागा पकडून शाह म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची कावड आपल्या खांद्यावर घेतली आहे. ती कावड घेऊन ते देशाच्या चारही दिशेने निघाले आहेत. विकसित भारत हे मोदींचे स्वप्न आहे. आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था होऊन मोदींचे स्वप्ना पूर्ण होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाचा एक मुद्धा संपल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे जनतेला अकोला लोकसभा मतदार संघातून अनुप धोत्रे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत होते. या विराट प्रचार सभेच्या व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारताकळे, खासदार भावनाताई गवळी, नकुल देशमुख, बळीराम सिरस्कार, आमदार वसंत खंडेलवाल, प्रदेश भाजपा मीडिया समय वन प्रमुख विश्वास पाठक प्रवक्ते आशिष चंद्रानी माजी आमदार वसंत खोटरे, विजय अग्रवाल विजय जाधव तेजराव थोरात कृष्णा शर्मा किशोर पाटील श्याम बडे जयंत मसणे, राजेश काळे पंकज साबळे विजय देशमुख श्रीरंग दादा पिंजरकर, कृष्णा देशमुख संदीप संदीप पाटील, चैनसुख सुख संचेती दिलीप जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणात राज्य आणि केंद्र सरकारची माहिती देऊन उपस्थिततांचे मन जिंकून घेतले. आमदार हरीश पिंपळे गोपीकिशन बाजोरिया, तुकाराम बिडकर आमदार अमोल मिटकरी, विठ्ठल लोखंडकर जयदीप कवाडे, चैनसुख संचेती, आमदार रणधीर सावरकर, उमेदवार अनुप धोत्रे यांनी दहा वर्षाचा लेखाजोखा तसेच आगामी विकसित संकल्पना प्रस्तुत केला कार्यक्रमाचा संचालन भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन लोकसभा संयोजक विजय अग्रवाल यांनी केले.
क्षणचित्रे
• मातृशक्तीची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
• पाऊस आल्यावर सुद्धा नागरिक मंडप सोडून गेले नाही उलट मोठ्या संख्येने उपस्थित झाले अकोल्याच्या इतिहासामध्ये तीन तास चालणारी ही एकमेव जाहीर सभा आहे यामध्ये नागरिक कोणतेही न हालता पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनुप धोत्रे व भाजपा महायुतीवर विश्वास व्यक्त करत होते.
• औ सभा सुरू होण्याच्या आधी व सभा संपल्यानंतर अकोला शहराच्या सतरा किलोमीटर रस्ता तीन तास जाम झाला यावरून मोठ्या संख्येने एक लाख जवळपास ही सभा झाली.
• विरोधकांच्या अपप्रचारानंतर सुद्धा नागरिकांची उपस्थिती व सभेबद्दल अनेक अफवांचा बाजार केल्यावर सुद्धा नागरिक यांनी महायुतीवर विश्वास व्यक्त केला व महायुती मोदी यांची गॅरंटी ही विजयाची नांदी आहे
• ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती वाजत गाजत वेगवेगळ्या मोदींच्या नावाचे गजर करून नागरिक सभेत सहभागी झाले होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या