विश्वरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर व स्वराज्य रक्षिका महाराणी ताराबाई यांची जयंती भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना अकोला कार्यालयात साजरी करण्यात आली.!
अकोला. दि. १४.०४.२०२४ रोजी स्थानिक गीताई सभागृह जुने शहर अकोला येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार संघटना अकोला साजरी करताना डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस कॉ. रमेश गायकवाड यांनी हार अर्पण केले नंतर महाराष्ट्र व जगाचे देवेत्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस कॉ. अहमदखा पठाण यांनी तर महाराणी ताराबाई व सर्व महापुरुष यांच्या प्रतिमेला कॉ. ज्योती ताथोड यांनी हार अर्पन केले व उपस्थितांनी पुष्प अर्पण करूण उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांना जय शिवाय - जय भीम - लाल सलाम..! महाराणी ताराबाई यांना जय शिवाय - जय भीम - लाल सलाम..! डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर अमर रहे अमर रहे..! महाराणी ताराबाई अमर रहे अमर रहे..! जब तक सुरज रहेगा डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर ओर महाराणी ताराबाई आपका नाम रहेगा असे गगनभेदी नारे उपस्थितांनी दिले.
अभिवादन सभेत कॉ. रमेश गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगित म्हणाले की, समाजवादाशिवाय न्याय अश्यक्य असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी १९४६ मध्ये नोव्हेंबर महिन्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणाले होते, "मला हे समजत नाही की, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायावर विश्वास असणाऱ्या कोणत्याही सरकारला देशाची अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था असल्याशिवाय न्याय देणे कसे अश्यक्य होईल ?' त्यानी इंग्रजी केलेले विधान पुढीलप्रमाणे I do not understand how it could be possible for any future government which believes in doing justice socially, economically and politically,unless its economy is a socialistic economy? (संदर्भ: संविधान सभेतील भाषण, १७ डिसेंबर, १९४६) म्हणुन भाजप हटाव देश बचाव मोहीम अकोल्यात राबवावी लागेल सभेत कॉ. रमेश गायकवाड, कॉ. नयन गायकवाड, कॉ. अहमद खा पठाण, कॉ. ज्योती ताथोड, कॉ. प्रिया वरोटे, कॉ. सुमित गायकवाड, कॉ. संगीता निखाडे, उपस्थित होते..! ची माहिती प्रसिद्धी पत्रकारद्वारे कॉ. नयन गायकवाड यांनी कळविली आहे.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे
0 टिप्पण्या