गावांचा विकास हाच मोदी यांचा संकल्प! राष्ट्रहित, आपला परिसराचा विकास करण्यासाठी महायुती ला विजयी करा- आ. डॉक्टर कुटे
अकोला, दि. - एखाद्या गावाचे समाधान करण्यासाठी फक्त आश्वासन देऊन महायुती चे नेते थांबत नाही. एकदा शब्द दिला की तो पूर्ण करते आणि एवढेच नव्हे तर संकल्प करून विकासाच्या प्रवाहात ते गाव सामील करून घेतात. कारण आदर्श गावांचे निर्माण, हाच माझा संकल्प असतो, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेची उमेदवार म्हणून निवड केलेले अनुप धोत्रे यांना विजयी करा असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले.
तेल्हारा येथेमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. प्रकाश भाऊ भारसाकळे प्रमुख अतिथी आमदार संजय कुटे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर लोकसभा उमेदवार अनुपजी धोत्रे, जिल्हा अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, विजय अग्रवाल, अकोट विधानसभा प्रमुख राजेश रावणकर, विधानसभा विस्तारक संजय शर्मा,भाजपा तालुकाध्यक्ष गजानन उंबरकर,शहराध्यक्ष महेंद्र गोयनका,माजी जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष कैलास ठोकणे, शहराध्यक्ष संतोष छांगाणी,शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव,आरपीआय आठवले गट शहराध्यक्ष भारत पोहरकार, स्मिताताई राजनकर,माजी न.प.अध्यक्षा जयश्रीताई पुंडकर,अनिल पोहने, कल्पनाताई पोहने,अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष उमेश पवार,माजी जिल्हा परिषद सदस्या सुलभाताई दुतोंडे, माजी न.प.सदस्या सौ.आरतीताई गायकवाड,सुनिता बगाडे, वंदनाताई आमले,शेतकरी पॅनलचे राजेश खारोडे अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाध्यक्ष शेरूभाई पंचगव्हाणकर आदींची मंचावर उपस्थिती होती.सूत्रसंचालन डॉ. बाबुरावजी शेळके तर आभार सरचिटणीस रवी गाडोदिया यांनी केले.
ना. एवढी यावेळी आमदार प्रकाश भारसाकले, म्हणाले, ‘विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वात भारत प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे. गरीब आणि कष्टकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील माणूस कसा सक्षम होईल, शेतकरी कसा संपन्न होईल, महिला आणि बेरोजगार यांच्यासाठी स्वयंरोजगाराची दारे कशी उघडली जातील यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. गोरगरीब जनतेच्या आणि कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर सतत आनंद दिसावा, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, उत्तम व सुलभ आरोग्य सेवा मिळावी यासाठी माझे सतत प्रयत्न असतात. हे करताना जात-पात, धर्माचा कधीच विचारही केला नाही. जनतेचा प्रतिनिधी म्हणून लोकांनी जो विश्वास माझ्यावर आतापर्यंत टाकलाय तो सार्थ ठरविणे हेच माझे प्रथम कर्तव्य आहे व अनुप धोत्रे हे कार्य करण्यासाठी सदैव तत्पर राहतील अशीही ती म्हणाले.
*फक्त विकासाचा विचार*
महाराष्ट्र राज्यात केवळ विकास आणि विकासाचा संकल्प घेऊन नामदार एकनाथ शिंदे अजितदादा पवार नामदार देवेंद्र फडणवीस कार्यरत आहे भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने अनुप धोत्रे यांना देशात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आपण साथ द्यावी आणि महायुती सोबत राहावे, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या