सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल शासनाने दिलेल्या हमीभावात विक्री केंद्रावर करण्यासाठी आवश्यक ती नोंदणी करावी- आमदार रणधीर सावरकर
सोयाबीन विक्री करण्याकरिता जिल्ह्यामध्ये एकूण १० केंद्र खरेदी केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहेत सध्या खुल्या बाजारात सोयाबीन मालाचे भाव अत्यंत कमी आहेत केंद्र शासनाकडून नाफेड मार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात दहा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत शासनाचा सध्या ४६०० रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव आहे शासनाने हवीभावामध्ये सोयाबीनची खरेदी करावी तसेच खरेदी केंद्र तातडीने पूर्ण क्षमतेने चालवावीत याकरिता आमदार राज्याचे पणन मंत्री मा. अब्दुल सत्तार तसेच सहकार पणन विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केलेली आहे, सोयाबीनचे भाव खुल्या बाजारात कमी असल्याने शेतकऱ्यांनी आपला भाव कमी भावात विकू नये तसेच सोयाबीनचे कमी असलेले दर लक्षात घेता सोयाबीन पिकाला शासनाने बोनस स्वरूपात आर्थिक मदत करावी अशी मागणी सुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी पणन मंत्री मा. अब्दुल सत्तार यांच्याकडे मागणी केली आहे सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासनाने 6 फेब्रुवारी ची मुदत ठरवून देण्यात आली असली तरी ही मुदत वाढवून देण्यासाठी आमदार सावरकर यांनी मागणी केलेली असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादित मालाची विक्री करण्याकरिता आवश्यक ती नोंदणी करावी आणि शासनाच्या खरेदी केंद्रावरच आपल्या मालाची विक्री करावी अशी विनंती सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केली आहे,
0 टिप्पण्या