२२ जानेवारीला दिवाळी साजरी करू पण दिवाळं निघाल्यांनी खर्चाला पैसा आणायचा कोठून ?
"शासनाने पालावरच्या लोकांचा आणि बेरोजगार झालेल्या जनतेचा विचार करून जनधन खात्यात रक्कम वळती करून स्वस्त धान्य दुकानातून गहू किराणा धान्य, तेलाचे पाकीट, आनंदाचा शिधा आणि नविन कापडाचा पुरवठा करावा." - ग्रामिण जनतेची मागणी
अकोला/वाशिम-
कारंजा (लाड) ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ) : सततच्या रंग बदलणाऱ्या हवामानामुळे हातघाईला आलेला शेतकरी, बेरोजगार झालेला आणि उपासमारीला कसेबसे तोंड देत असलेला मजूर वर्ग यांचा कोणताच विचार न करता दुष्काळ सदृश्य परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा विचार न करता,येत्या दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा विराट असा उद्घाटन सोहळा साजरा केल्या जात असून,खरोखरीचे रामराज्य आणल्याचा आव आणून, शासनातील मंत्री संत्री, खासदार - आमदार आणि विविध संस्था संघटना,दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी "न भुतो न भविष्यती" अशा प्रकारे हा दिवस साजरा करण्याकरीता "प्रति दिपावली" साजरी करण्याचे आवाहन करून घरोघरी नविन कपडे,गोडाधोडाचे पदार्थ,सजावट,रोषनाई,तेलाच्या दिव्यांचे चिरांगण लावण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु "डोळे असून आंधळे" झालेल्या सत्ताधारी मंत्री,संत्री,खासदार, आमदार,संस्था,संघटना यांना कळत नाही की,चालू वर्षीच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीने जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी पार कंगाल होऊन नैराश्यात वावरत आहे. हाताला कामच नसल्याने येथील मजूर,कामगार,सुशिक्षीत बेकार मोबाईलवर यांचे केवळ तमाशे बघत वेळ दवडत जीवन जगत आहे. यांच्या घरात चहाला साखर आणि भाजीच्या फोडणीला तेल नाही आणि अशा या विपरीत स्थितीत सत्ताधारी शासनाचे मंत्री,संत्री,खासदार,आमदार मुर्खा सारखे, "घरोघरी रोषनाई करीत दिव्याचे चिरांगण" लावण्याचे,गावपातळीवरच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवर उपरोधीक सल्ले देत आहेत. तेव्हा प्रश्न पडतो,स्वतः जनतेच्या जीवावर वातानुकीलीत महालात राहून,लाऊडस्पिकर वरून सल्ले देणाऱ्या या महाभागांना खरा "राम" तरी कळला काय ? रामराज्य म्हणजे काय ? याचा भावार्थ तरी समजतो काय ? यांना जर खरे रामराज्यच स्थापन करायचे असेल . . ! रामराज्याची दवंडी पिटवायची असेल तर यांनी सर्वप्रथम लक्षात घेतले पाहीजे की, दि 22 जानेवारीला दिवाळी तर साजरी होईल हो पण दिवाळं निघालेली भोळी भाबळी जनता खर्चाला पैसा आणणार कोठून आणि म्हणूनच दि 22 जानेवारी 2024 प्रतिदिवाळीच साजरी करायची असेल तर शासनाने प्रत्येकाच्या जन धन खात्यामध्ये पैसे टाकले पाहिजे.जगाचा पोशींदा म्हणून चन्याच्या झाडावर चढवून ज्यांची सदैव फसवणूकच केली जाते. अशा प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ करून,संपूर्ण दुष्काळ जाहीर करून तशा उपाययोजना तात्काळ केल्या पाहीजेत. प्रत्येकाला धान्याचे प्रमाण वाढवून आनंदाचा शिधा,तेलाचे डबे आणि नविन कपडे दिले पाहीजे.व नंतरच प्रति दिवाळी करण्याचा सल्ला दिला पाहीजे. तसेच महत्वाचे म्हणजे दि 22 जानेवारी 2024 रोजी प्रतिदिवाळी साजरा करण्याचे फुकटचे सल्ले देणारी पांढरपेशे नेते तसेच रामराज्याचा खोटा प्रचार प्रसार करणारी विविध मंडळे, संस्था,संघटना,परिषदा यांनी रामराज्याकरीता पुढाकार घेऊन कमितकमी ग्रामीण भागातील बेरोजगार मजूर कामगार, पालावरचे भटक्या जमातीचे लोकं,गोरगरीब निराधार, दिव्यांग व हातावर पोट असणाऱ्या प्रत्येकांना प्रतिदिवाळी साजरी करण्याकरीता अन्नधान्य, दिवाळीचा किराणा,दिवे लावण्याकरिता तेलाची पाकीटे, नवीन कपडे,दिवाळीचा फराळ व मदतीची रोख रक्कम दिली पाहीजे असी गोरगरीब निराधारांकडून मागणी होत आहे. असे वृत्त ग्रामिण जनतेमधून मिळाल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या