Ticker

6/recent/ticker-posts

साहित्यिक समाजाचा आरसा, त्याचे प्रतिबिंब साहित्यातून उमटले पाहिजे   डाॅ. रमेश अंधारे : पाचव्या अकाेला जिल्हा मराठी साहित्य संमेलन उत्साहात

साहित्यिक समाजाचा आरसा, त्याचे प्रतिबिंब साहित्यातून उमटले पाहिजे  
डाॅ. रमेश अंधारे : पाचव्या अकाेला जिल्हा मराठी साहित्य संमेलन उत्साहात


अकाेला: साहित्यातून मानवी मुल्याची जपवणूक हाेते. माेबाईलमुळे माणूस वाचनापासून दुरावत चालला आहे. त्यामुळे नव्यापिढीने पुस्तकांसाेबत मैत्री करणे गरजेचे आहे. साहित्य समाजाचा आरसा असून, त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटलेच पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कादंबरीकार डाॅ. रमेश अंधारे यांनी रविवारी येथे केले.


जुने शहरातील श्री शिवाजी विद्यालयातील स्व. बाजीराव पाटील साहित्यनगरीत पाचव्या अकाेला जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे ३१ डिसेंबर राेजी भाजपाचे डाॅ. अशाेक ओळंबे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी अध्यक्षीय भाषणात डाॅ. अंधारे बाेलत हाेते. भाषेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध असे प्रकार नसतात. बोलीभाषा ही मूळ असते तर मराठी भाषा ही प्रमाण असते. प्रत्येकाने आपल्या बोली भाषेचा सन्मान जपला पाहिजे, असे विचार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी व्यक्त केले. उद्घाटन साेहळ्याला डाॅ. रमेश अंधारे, पुष्पराज गावंडे, भाजपाचे डाॅ. अशाेक ओळंबे, डाॅ. माेहन खडसे, युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, काॅंग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, राजाभाऊ देशमुख, स्वागताध्यक्ष मुख्याध्यापक मनाेज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती हाेती. उदघाटन साेहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. महादेव लुले यांनी केले. प्रास्ताविक आयाेजक संदीप देशमुख यांनी केले. चंद्रशेखर भुयार यांच्या अध्यक्षेत गझल मुशायरा रंगला. यामध्ये गझलकार नीलेश कवडे, मिलिंद हिवराळे, प्रवीण हटकर, एजाज शेख, मंगेश गजभिये, चंद्रशेखर महाजन आदींनी रचना सादर केल्या. सूत्रसंचालन गाेपाल मापारी यांनी केले. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन अनिकेत देशमुख यांनी केले. कवीसंमेलनात गजानन मानकर, हिम्मत ढाळे, धीरज चावरे, संजय कावरे, प्रशांत वरईकर, गणेश मेनकार आदींनी रचना सादर केल्या. समारोपाने शेवट झाला समारोप सत्राचे प्रमुख अतिथी म्हणून संजय मा देशमुख तुळशीरम बोबळे विष्णुपंत जोध अंकुर चे हिम्मत ढाळे वासुदेवराव खोपडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. समारोप चे सूत्रसंचालन धीरज चावरे तर आभार डॉक्टर गणेश मेनकार यांनी मांडले....


------------
पुस्तकांशिवाय ज्ञान नाही- डाॅ. प्रतिमा इंगाेले
जाेपर्यंत काेऱ्या कागदावर काही लिहिल्या जात नाही, छापल्या जात नाही, ताेपर्यंत काेऱ्या कागदाला शहाणपण येत नाही. तेव्हाच त्याला अर्थ प्राप्त हाेताे. माणसाचेही तसेच आहे. माणसाने पुस्तक वाचल्याशिवाय त्याला ज्ञान प्राप्त हाेत नाही. ज्ञान असल्याशिवाय त्याच्या व्यक्तिमत्त्वाला धार येत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. प्रतिमा इंगाेले यांनी केले.
-----------


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या