Ticker

6/recent/ticker-posts

घरकुल योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व निराधार कधी???

घरकुल योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व निराधार कधी???


शासन प्रशासनाकडून,प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व निराधार यांना मृत्युनंतर मिळणार काय ? धार्मिक स्थळावर (मंदिरे आणि दर्गाह च्या जागेत) पिढ्यान पिढ्या राहणारे नागरिक 'नमुना ड' ऐवजी प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेपासून वंचित. *स्थानिक प्रशासन प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल देत नसल्याने शहरातील हजारो वंचित गरजू मतदार येत्या सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार घालणार* कारंजा (लाड) (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : मागील नऊ वर्षापूर्वी केन्द्र शासनाच्या सत्तेत भाजपा पक्ष येताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी,देशातील प्रत्येक बेघर, फुटपाथवर राहणारे निराधार,दिव्यांग इत्यादी व्यक्तींना घरकुल देण्याची योजना जाहीर केली होती.व त्या योजनेच्या अनुषंगाने गोरगरीब,दारिद्री, फुटपाथवर राहणारे निराधार व दिव्यांग व्यक्तीचे स्थानिक नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व्हे करून त्यांचे फोटो सुद्धा काढण्यात आले होते.परंतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या भाजपाच्या सरकारने आपल्या या दिव्यांगाच्या बेघर योजनेवर नऊ वर्षे उलटूनही कारंजा शहरात अद्याप पर्यंत प्रत्यक्षात अंमल बजावणी केलेली नाही.सदर योजनेकरीता गोरगरीब दिव्यांगाना शासकिय भूखंड उपलब्ध करून देऊन,प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेंतंर्गत, तयार घरकुल उपलब्ध करून दिलेच नाहीत.त्यामुळे फुटपाथवर राहणाऱ्या गरजू निराधार दिव्यांगाचा अक्षरशः 100% भ्रमनिराश झाल्याचे सत्य वास्तव आहे.त्यामुळे शासनाच्या या लबाड घोषणेचे अक्षरशः वाभाडे निघाल्याचे कटूसत्य आहे. 


भाजपा शासन आणि प्रशासनाने गोरगरीब दिव्यांगाना दाखवलेल्या स्वप्नांचा भंग झालेला असून, त्यामुळे निराधार दिव्यांगामध्ये भाजपा सरकार विरुद्ध कमालीचा संताप व आक्रोश व्यक्त केल्या जात आहे.ज्यांचेकडे स्वतःच्या मालकीची जागा नाही त्यांना सरकारी जागा उपलब्ध करून देऊन घरकुल बांधकाम करण्याचा शासनाचा संकल्प होता.त्यामुळे त्यांनी फुटपाथवर राहणाऱ्या निराधाराचा आणि दिव्यांगाचा सर्व्हे केला होता.परंतु अंमलबजावणी केली नसल्याने प्रत्यक्ष शासन खोटे ठरल्याने निराधार आणि दिव्यांगानी या शासनावर आणि राजकिय भाजपा पक्षावर यापुढे आमचा विश्वास राहीला नाही अशा भावना व्यक्त करीत येत्या सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.तसेच दुसरे म्हणजे कारंजा शहर हे अतिप्राचिन शहर असून हिंदू मुस्लिमाच्या पुरातन धार्मिक स्थळाच्या जागेवर मंदिर आणि दर्गाहच्या आश्रयाने येथे पिढ्यानपिढ्या आजोबा पणजोबाच्या काळापासून वर्षानुवर्षे नागरीक आपल्या कुटूंबासह गुजरान करीत आहेत. आपल्या राहत्या जागेचा घरटॅक्स ( मालमत्ता कराचा ) भरणाही ते नियमीत करीत आहेत.परंतु त्यांच्याकडे भूमिअभिलेखाचे नमुना ड प्रमाणपत्र नाही त्यामुळे ह्या नागरिकांना शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेतून डावलले आहे. ह्या खोटारड्या आणि लबाड शासनाच्या सर्वच योजना लबाड ठरलेल्या आहेत. "अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना हे शासन घरकुल उपलब्ध करून देत आहे. परंतु मंदिर, दर्गाह,धार्मिक स्थळावर शेकडो वर्षापासून राहणाऱ्या गरजूंना मात्र घरकुल उपलब्ध करून दिल्या जात नाही.आणि कारंजा शहरातील आमदार, लोकप्रतिनिधी आणि विविध राजकिय पक्षाचे स्वार्थी नेते दारिद्र्यात खितपत असलेल्या गरजू गोरगरीबाच्या घरकुल योजने विषयी संवेदनशिल नाहीत त्यामुळे अखेर सन 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक गोरगरीब व्यक्तीनी "आधी घरकुल द्या नंतर तुम्ही आम्हाला मताची भिक मागा." असा स्पष्ट निर्णय त्यांना सांगण्याचे ठरवून काहीही झाले तरी सन 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आहे. असे वृत्त समाजसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या