भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे अमृत महोत्सव निमित्त संकल्प शपथ
अकोला
स्वतंत्र संग्रामामध्ये समाजातील सर्व नागरिकांचा सहभाग असून प्रत्येक सहभाग असणाऱ्यांना नमन करणे या पवित्र भूमीमध्ये या देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प केला अशा हुतात्म्यांना व या लढा मध्ये त्याग तपस्या बलिदान, कोणतीही अपेक्षा न ठेवता देशासाठी कार्य करणाऱ्यांना नमन करणे तसेच देशाला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेणारे शेतकरी सहकार क्षेत्र व व्यापारी उद्योजक विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सातत्याने देश सेवेसाठी आयुष्य देणारे व सरकारी नोकरी करून देशाच्या प्रगतीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना या 75 व्या अमृत महोत्सव निमित्त संवाद साधून त्यांच्या कार्याचा गौरव करणे यासाठी मेरीमाटी मेरा देश अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवून सुरू केल्याची प्रतिपादन सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी केले.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे👆 स्पर्श करा
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा
अकोला हे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या भाजपा कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारत सरकारने दिलेल्या संकल्पच्या शपथ यावेळी घेण्यात आली
कमल सखी मंच अध्यक्षा सौ.सुहासिनीताई धोत्रे,सौ.मंजुषा ताई सावरकर,सौ.नूतनताई पिंपळे,सौ.पुष्पाभाभी खंडेलवाल, सौ.सीमाताई मांगटे पाटील,सौ अर्चनाताई मसने, अर्चना शर्मा , महानगराध्यक्ष जयंत मसने, किशोर पाटील विजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस सौ.रश्मीताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी संस्थेच्या संदर्भात भाजपा कार्यालयात अकोला शहर व ग्रामीण ची बैठक आयोजित करण्यात आली होती.
*सहकार संस्थेची बैठक सुरू होण्या अगोदर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन भारतमातेच्या वेशातील साक्षी रत्नपारखी आणि शुभ्रा देशमुख या चिमुकल्यांचा सन्मान करण्यात आला*.
*आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार अमृतमहोत्सवाची सांगता *मेरी माटी मेरा देश* म्हणजेच *माझी माती माझा देश* या अंतर्गत शेतकरी वेशातील सौ.प्रणिता समरीतकर आणि चि.आदित्य राजेश समरीतकर यांनी अकोल्याची माती महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ.रश्मीताई जाधव यांच्या हाती सुपूर्द केली*यावेळी चंद्रशेखर आजाद भगतसिंग राजगुरू संत गजानन महाराज लोकमान्य टिळक या भूमीमध्ये आले तसेच राष्ट्रीय तिलक शाळा पारस वाडेगाव शहीद स्मारक या भागातून माती व जल मातृ शक्तीने जमा करून प्रदेश भाजपाकडे सुपूर्द केले.
सहकारी संस्थेचे महत्त्व सांगून जिल्ह्यातील महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करत प्रत्येक महिलेला आर्थिक सक्षमीकरण मिळायलाच हवे असे प्रतिपादन महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ.रश्मीताई जाधव यांनी केले* सर्व उपस्थितांना सहकारी संस्थेविषयी आवश्यक अश्या सूचना देऊन काम सुरू ठेवण्यास प्रेरित केले.
या बैठकीसाठी मंचावर महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सौ.रश्मीताई जाधव, माजी महापौर सौ.अर्चनाताई मसने,सौ. अर्चनाभाभी शर्मा,महानगराध्यक्ष सौ. चंदाताई शर्मा,जिल्हाध्यक्ष सौ.कुसुमताई भगत,सौ.सुलभाताई सोळांखे या उपस्थित होत्या.भाजपा कार्यालयात अकोला शहर व ग्रामीणच्या सर्व महिला उपस्थित होत्या.बैठकीचे संचलन सौ.रश्मी कायंदे यांनी केले. प्रास्ताविक चंदाताई शर्मा तर आभार प्रदर्शन कुसुमताई भगत यांनी केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या