Ticker

6/recent/ticker-posts

प्रत्येक घरावर अभिमानाने फडकवा तिरंगा- -आमदार सावरकर

प्रत्येक घरावर अभिमानाने फडकवा तिरंगा- - आमदार सावरकर


'हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन


अकोला जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण

अकोला : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असून आपण आता शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणार आहोत. अशात प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवूया आणि ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला अकोला व पश्चिम विदर्भात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.


‘हर घर तिरंगा’ स्वातंत्र्याचा उत्सव १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर व भाजपा पदाधिकारी यांनी. यांच्या निवासस्थानी ध्वजारोहण केले . याप्रसंगी त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांत राष्ट्रध्वजाचा संपूर्ण आदर राखत प्रत्येक घरावर तिरंगा दिमाखदारपणे फडकवावा. तिरंगा हा प्रत्येक भारतीयाची राष्ट्रीय अस्मिता आहे.’ अबाल वृद्धांमध्ये देशाभिमान जागृत राहावा यासाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले. अकोला व पश्चिम विदर्भात जिल्ह्यातून या अभियानाला यापूर्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदाही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिम विदर्भ अकोला जिल्ह्यातील जनता ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होईल, असा विश्वासही भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर. यांनी व्यक्त केला.


भारतीय अस्मितेचे प्रतीक-
तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नसून भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला. या अभियानाच्या माध्यमातून सर्व शहिदांचे स्मरण करण्याची संधी देशवासीयांना मिळणार आहे.स्वातंत्र्यसैनिकांनी हसत हसत देशासाठी आपले प्राण अर्पण केले.स्वतः च्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य भारत मातेच्या चरणी अर्पण केले. अश्या वीर शहिदांचे स्मरण करूया.२०४७ साली जेंव्हा स्वातंत्र्यदिनी तिरंगाचे ध्वजारोहण केले जाईल तेंव्हा या राष्ट्रध्वजाला जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक वंदन करतील, त्यासाठी प्रत्येक दिवशी देशाला पुढे प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करूया असेही सौ. सुहासिनी ताई संजय धोत्रे म्हणाल्या .


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या