Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीमधे बचावकार्यासाठी नियोजन समीती मार्फत नाविन्यपूर्ण अत्याधुनिक बोटी व साहित्य 

अतिवृष्टीमधे बचावकार्यासाठी नियोजन समीती मार्फत नाविन्यपूर्ण अत्याधुनिक बोटी व साहित्य 


अकोला
जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे किंवा नदीमध्ये पुरामुळे आपदग्रस्तांच्या बचावकार्यासाठी अद्ययावत बोटी किंवा तत्सम अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मा.उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री देवेंद्र जी फडणवीस साहेब यांनी जिल्ह्यात नियोजन समीती मार्फत नाविन्यपूर्ण योजनेमधून मुंबई किंवा सागरी भागात धर्तीवर असलेल्या अत्याधुनिक बोटी साहित्य उपलब्ध करून दिली आहेत, महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी चांगलं काम करणारे गाडगेबाबा आपत्ती बचाव दलाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या संकल्पनेतून २५ लक्ष रुपयाचे साहित्य जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनात आज उपलब्ध करून देण्यात आले. तसेच केळीवेळी व दोनवाडा गावासाठी प्रत्येकी ५ लक्ष रुपयांची १-१ बोट सुद्धा ऊपलब्ध करून दिली.


सातत्याने समाजसेवेच्या माध्यमातून कार्य करणारे दीपक सदाफळे यांच्या कार्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या पुढाकाराने आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल व नियोजन समितीचे सदस्य जिल्हाधिकारी श्रीमती नीलिमा अरोरा यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हा सह पश्चिम विदर्भ तसेच महाराष्ट्रातील इतर क्षेत्राला उपयोगी पडणारा मुंबईच्या धरतीवर 25 लाख रुपये खर्च करून सर्व सुविधायुक्त बचाव कार्यासाठी साहित्य देण्यात आले आहे ज्यामुळे नदीच्या पुरामध्ये वाहून जाणाऱ्यांना शोध कार्यासाठी लागणारा वेळ याची बचत होऊन अनेकांचे प्राण वाचवण्यात उपयोगी पडणारा या साहित्याचा वापर संत गाडगेबाबा बचाव पथक करणार असा आशावाद भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी याप्रसंगी करून जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राच्या विकासासाठी गतिशील राहणारे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस समाजातील सर्व नागरिकांचा कल्याण व्हावा व विदर्भाचा विकास व्हावा जनतेला चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहतात त्यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम महाराष्ट्रात पहिला होत असून आता गौरव आपल्याला असल्याचे आमदार सावरकर याप्रसंगी म्हणाले.


यावेळी आमदार रणधीर सावरकर सह, निमा अरोरा, जिल्हाधिकारी, सौरव कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी, अढाऊ मँडम अध्यक्ष जिल्हा परिषद, माधव मानकर, राजेश बेले ,शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे, विठ्ठल चतरकर, जयंत मसने, मोहन पारधी अक्षय जोशी, सदाफळे, गाडगेबाबा बचाव पथक पिंजर,ईत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दीपक सदाफळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व आमदार रणधीर सावरकर व जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करून समाजहित साठी व चांगल्या काम करणाऱ्याचा गौरव सन्मान सरकार असून पीडित वंचित तसेच अडचणीत सापडणार यांना आधार देण्याचं काम सरकारने केल्याबद्दल अभिनंदन व आभार व्यक्त करून त्यांनी महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम बचाव कार्याला प्रोत्साहन देणारा व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या