Ticker

6/recent/ticker-posts

राज्यपालांना आमदार अमोल मिटकरी यांचे पत्र... 

राज्यपालांना आमदार अमोल मिटकरी यांचे पत्र... 


राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल रमेश बैस यांना लिहिले पत्र. या पत्राद्वारे त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती बरोबरच अकोल्या जिल्ह्याच्या विकासाबाबत पाढा वाचला. लोकनेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री पदावर असताना या महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाचा परिपाठ दिला आहे. राज्यात सध्या दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाल्याने राज्यातील जनतेला असुरक्षित वाटणे साहजिक आहे तसेच महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोला जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री सुद्धा आहेत. मागील तीन महिन्यात अकोल्यात अंध महिलेवर झालेला बलात्कार, पारस तालुका बाळापूर येथे चक्रीवादळात झालेला दहा लोकांचा मृत्यू, व्हाट्सअप स्टेटस वरून उसळलेली दंगल, शहरात वाढलेले गुन्ह्याचे प्रमाण, परवा चर्चगेट मुंबई येथे सावित्रीबाई फुले वस्तीगृहात अकोल्यातील तरुणीवर झालेला बलात्कार व खून.


कांदा व कापूस उत्पादक शेतकन्यांवर झालेला अन्याय, बँकेच्या सिबिल अटीमुळे खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची बँकेकडून होणारी आर्थिक कोंडी, जिल्हा नियोजनाचा अपूर्ण निधी यासह खाजगी शिकवणी क्लासेस कडून केली जाणारी आर्थिक लूट, बंद पडलेला उड्डाणपूल, आरटीई अंतर्गत होणारा अनेक शाळातील गैरव्यवहार, आदी मोठे प्रश्न जिल्ह्यासमोर असताना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. आपण या राज्याचे पालक आहात आमच्या जिल्ह्यातील रोजगार संबंधी एकही प्रश्न मागील तीन वर्षात संसदेत मांडला गेला नसल्याची खंत आहे. ग्रामीण भागातील भीषण पाणीटंचाई. शेतकन्यांबाबत कृषी विद्यापीठ व महामंडळ महाबीजची असणारी अनास्था या प्रश्नाच्या उत्तरा करिता महिन्यातून एक दिवस पालकमंत्र्यांनी जिल्ह्यास द्यावा याबाबत आपण स्वतः पालक मंत्र्यांना अवगत करावे व गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती आमदार अमोल मिटकरी यांनी पत्राद्वारे केली आहे.


जिल्ह्याच्या विकासाची मार्गे मोकळी करावीत

त्याच बरोबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर सुरू व्हावे. विमानतळ विदर्भवासियांसाठी महत्त्वाचे असून लवकरात लवकर हे विमानतळ सुरू करण्यात यावे. अकोला जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसिंचन प्रकल्प राबविण्यात यावेत. डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात भरपूर जागा रिक्त आहे या जागा तात्काळ भरण्यात याव्या, आधी समस्यांचे निराकरणही करण्याची विनंती करण्यात आली.


बोगस बियाणे संदर्भात कारवाईची मागणी

नुकत्याच बोगस बियाणे संदर्भात झालेल्या धाडीमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक दीपक गवळी आणि डुप्लिकेट बियाणे निर्मिती प्रकरणी आरोपी असलेला हितेश भट्टड याच्यासह एमआयडीसी अकोला येथील गुणवत्ता अधिकारी गेल्या काही दिवसांपासून खरीप हंगामापूर्वीच बिनदिक्कतपणे कारवाई करत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे. काही अधिकाऱ्यांसह अनेक दुकानदारांकडून पैसे वसूल करण्यास या लोकांनी सुरुवात केली आहे. याबाबत दुकानदारांनी केलेल्या तक्रारीची प्रत पत्रासोबत दिली आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी व्हावी. तसेच कृषी मंत्री दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कार्यवाही करण्यात यावी. एक आदर्श राज्यपाल आपल्या रूपाने महाराष्ट्राला लाभला असे आम्ही समजतो या राज्यात गतकाळात राज्यपाल पदाची गरिमा पूर्णपणे राजकीय बनवल्या गेली होती. परंतु आपण यास अपवाद ठराल याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही, तरी राज्याच्या विकासाबाबत विचार केल्यास, वरील सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून निराकरण करण्याचे पत्राद्वारे विनंती आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या