Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा गांधीजींचे सत्य अहिंसावादी विचारच जगाला तारू शकतात —महादेवराव भुईभार

महात्मा गांधीजींचे सत्य अहिंसावादी विचारच जगाला तारू शकतात —महादेवराव भुईभार


सर्वोदय मंडळाचा सूत कताई यज्ञ
 

अकोला— राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे सत्य -अहिंसावादी विचारच जगाला तारू शकतात, गांधी विचाराशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी केले. जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त आयोजित सुत कताई यज्ञाचे समारोपप्रसंगी बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड होते .
       सकाळी ८वाजतापासुन पुज्य महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वोदयी कार्यकर्त्यांनी अंबर चरख्यावर सुतकताई करून महात्मा गांधीजींच्या स्मृतीस कृतीशील अभिवादन केले.आमदार अमोल मिटकरी यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन गांधीजींच्या स्मृतीस अभिवादन केले .कविवर्य रामराव पाटेखेडे यांनी व्यसनमुक्ती वर कविता सादर केल्या .
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन दादा दाखवले यांनी व्यसने सोडा पुस्तके वाचा असा संदेश आपल्या भाषणातून दिला. कापूस ते कापड अभियानाचे प्रमुख प्रल्हादराव नेमाडे यांनी आपल्या भाषणातून आपली नदी वाचवा, नद्या बारमाही वाहत्या करा ,नद्या जिवंत करा- नदी वाचली तर आपण वाचू, स्वदेशीचा वापर करा कापसापासून तर कापडापर्यंतची निर्मिती आपल्या घरीच करा असा उपदेश केला. 
        राष्ट्रपिता महात्मा गांधी विचारांचा जागर करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील कार्यकर्ते गांधीग्राम ते सेवाग्राम विचार यात्रा काढणार असल्याची माहिती बबनराव कानकिरड यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. कार्यक्रमाचे संचालन डाॅ. मिलिंद निवाने यांनी केले. आभार प्रदर्शन महेश आढे यांनी केले. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. 
सर्वश्री प्रा. राजाभाऊ देशमुख, आनंदराव गावंडे ,महाराष्ट्र अंनिसचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव गुडदे ,आत्माराम शेळके, गोवर्धन दादा खवले, रामदास शेळके, आत्माराम शेळके, अनिल मावळे, सुहास उदापूरकर, सचिन थिटे, किशोर कुमार मिश्रा, सुरेश मावळे ,रमेश जैन, दिलीप कराळे, संजू पळसपगार, भाकपचे कॉम्रेड रमेश गायकवाड, कॉम्रेड नयन गायकवाड ,आकाश इंगळे, रोहित तारकस, केशवराव कोठाळे, भाऊराव गावंडे, नितीन भरणे, सौ. एन .एस .उदापूरकर ,मंदाकिनी आगरकर, डॉ.सौ. ज्योत्स्ना कानकिरड, वंदना मोरे यांचे सह सर्वोदयी कार्यकर्ते, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या