महानगरात कला व चित्रकलाइ स्पर्धांचे आयोजन
अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षाच्या कालखंडामध्ये विविध सामाजिक व समाजाला उपयोगी विविध योजनेचा चित्रीकरण कलाकृतीने विद्यार्थ्यांनी काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा व योजना जनप्रयोगी असल्याचा प्रत्यय कृतीने दिला आहे असे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले. स्थानिक चित्रकला आयोजन समिती च्या वतीने शहरातील राजेश्वर काॅन्व्हेट विद्यालय रेणुका नगर यामध्ये विविध विद्यार्थ्यांनी वर्ग आठवी ते बारावीतील पंधराशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला या याप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार वसंत खंडेलवाल अध्यक्षस्थानी होते . कला आणि संस्कृती सोबत मानव कल्याणाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून राजेश्वर काॅन्व्हेट विद्यालय व आयोजन समिती उपक्रम समाजाला प्रेरणादायी असल्याचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी सांगितले.
महानगरात कला व चित्रकलाइ स्पर्धांचे आयोजन.
मा.खा श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सरचिटणीस मा.आ.श्री रणधीरभाऊ सावरकर, मा.आ.श्री गोवर्धनजी शर्मा, मा.आ.श्री वसंतभाऊ खंडेलवाल, मा.श्री विजयभाऊ अग्रवाल,मा.श्री अनुपभाऊ धोत्रे, मा.सौ अर्चनाताई मसने यांच्या प्रमुख उपस्थितीत, अकोला महानगरात कला व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले होते. अकोला पश्चिम मतदार संघातील वर्ग 08 ते 12 मधील 525 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धाचे आयोजन राजेश्वर कान्वेंट रेणुका नगर, अकोला यांनी केले असून या चित्रकला स्पर्धेचे विषय एक भारत श्रेष्ठ भारत, जी-20 जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दुष्टिने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राइक, कोरोंना लसीकरण मध्ये भारत नं 1, प्रधानमंत्री जनसेवेच्या विविध योजना, स्वछा भारत अभियान, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योग दिन, बेटी बचाव बेटी पढाव, चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला, इत्यादि होते.
या स्पर्धे मध्ये प्रथम, दिव्तीय, तृतीय, तसेच टॉप टेन, व पंचवीस विशेष पारितोषिक आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थीयांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. किशोरभाऊ मांगटे पाटील, विजयभाऊ मालोकार, विष्णुजी मेहेरे, माधव मानकर. संजय गोटफोडे, संजय जिरापुरे, संजय गोडा, गिरीश जोशी, विलास शेळके, पवन महल्ले, सतीश ढगे, तुषार भिरड, नीलेश निनोरे, संतोष पांडे, अमोल गोगे, वैभव मेहेरे, सौ. चंदाताई शर्मा, प्रा. स्मिताताई पारस्कर, रूपालीताई कुलकर्णी मॅडम, सौ. वरणकर मॅडम, सौ. सुमनताई गावंडे, सौ. अश्विनीताई हातवळणे, सौ. रंजनाताई विंचनकर, सौ. साधनाताई येवळे, सौ. मंगलाताई मसने, सौ. रश्मिताई कायन्दे, सौ. विजयताई देशमुख, सौ. ज्योतिताई मानकर, विनोद मापारी, व्यकुंठ ढोरे, बिसेन सर, विकी ठाकुर, उज्वल बामनेत, अभिजीत बांगर, कुणाल शिंदे, सुनील उंबरकर, उकंठराव सोनोने, हरीभाऊ काळे, नीतेश पाली, सचिन मुदीराज, अनुप गोसावी, सतीश येवले, अभिषेक भगत, रितेश जमनारे, भूषण इंदोरीया, आदित्य वानखडे, महेश गोधळेकर, विकी भिसे, राहुल धोटे, तसेच राजेश्वर कान्वेंट येथील शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
जागतिक उद्योगांना महाराष्ट्राचे आकर्षण!
महाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरे कुटुंबाचा
कट उद्योगविश्वाने उधळला भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर यांचे प्रतिपादन
अकोला
उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात १.३७ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखविला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले . गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या परिषदेकडे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली, तर आदित्य ठाकरे यांनी या परिषदेच्या निमित्ताने स्वित्झर्लंडची पिकनिक पार पाडली होती, असा टोलाही त्यांनी मारला.
महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा खोटा प्रचार करून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचाराची राळ उठवली व उद्योगविश्वात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मात्र, ठाकरे कुटुंबाचे आरोप धादांत खोटे व केवळ राजकीय वैफल्यातून होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले. आता दावोस परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या प्रतिसादामुळे ठाकरे पितापुत्रांचा महाराष्ट्रास बदनाम करण्याचा कट उधळला गेला आहे, असा प्रतिहल्ला त्यांनी केला. गेल्या वर्षीच्या परिषदेत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या करारानुसार ते उद्योग राज्यात यावेत यासाठी ठाकरे सरकारने काहीच पाठपुरावा केला नाही, उलट याच काळात महाराष्ट्राची बदनामी करून उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा कट आखला, असा आरोप करून आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, दावोस परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच सत्रात विविध उद्योगांकरिता महाराष्ट्राची दारे खुली करून १.३७ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारही केले आहेत. यातून राज्यात रोजगाराच्या सुमारे एक लाख थेट संधी निर्माण होतील. गेल्या वर्षी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या करारांचा पाठपुरावा करून राज्यात उद्योगांना पोषक वातावरण तयार केले असते, तर राज्याच्या विकासाचे चक्र उलटे फिरले नसते, असे ते म्हणाले. या परिषदेला मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी उपस्थित रहावयास हवे होते, पण त्यांनी त्याऐवजी आपल्या मुलास स्वित्झर्लंडची सहल घडवली अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.
शिंदे-फडणवीस सरकारने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयीचा विश्वास पुन्हा निर्माण केला आहे. सवलतींची हमी, मंजुरीची वेगवान प्रक्रिया आणि दर्जेदार पायाभूत सुविधा तसेच उद्योगांसमोर अडथळे आणणाऱ्या प्रवृत्तींना वेसण घालण्याची हमी सरकारने दिल्यामुळेच राज्यात पुन्हा उद्योगस्नेही वातावरण तयार झाले आहे. ठाकरे सरकारच्या काळात उद्योगक्षेत्रास लागलेली घरघर आता थांबली असून विकासाची वाटचाल नव्या दमाने सुरू झाल्याने, भविष्यात रोजगार, औद्योगिकरण, पायाभूत सुविधा आणि संपन्न जीवनशैलीचा अनुभव महाराष्ट्रास मिळेल असा विश्वासही प्रदेश सरचिटणीस आमदार सावरकर. .. यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात येऊ घातलेले काही महत्वाचे प्रकल्प-
- अमेरिकेच्या न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशनतर्फे चंद्रपूर येथे २० हजार कोटींचा कोल गसिफिकेशन प्रकल्प (रोजगार १५ हजार)
- ब्रिटनच्या वरद फेरो अलॉईजचा गडचिरोली जिल्ह्यात चार्मोशी येथे १२५० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार २ हजार)
- इस्रालयच्या राजूरी स्टील अँड अलाईजचा चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे ६०० कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार १ हजार)
- पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट चा पुणे जिल्ह्यात पिंपरी येथे ४०० कोटींचा प्लास्टिक ऑटोमोटिव्हज् प्रकल्प (रोजगार दोन हजार)
- गोगोरो इंजिनिअरिंग व बडवे इंजिनिअरिंगचा २० हजार कोटींचा प्रकल्प (रोजगार ३० हजार)
- रुखी फूडसचा २५० कोटींचा पुणे जिल्ह्यात ग्रीनफील्ड अन्नप्रक्रिया प्रकल्प
- ग्रीन्को रिन्यूएबल एनर्जीचा औरंगाबाद येथे १२ हजार कोटींचा प्रकल्प (रोजगार ६३००)
- जपानच्या निप्रो कॉर्पोरेशनचा पुणे जिल्ह्यात १६५० कोटींचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प (रोजगार २०००)
- इंडस कॅपिटल चा मुंबईत १६ हजार कोटींचा प्रकल्प
- मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणाबाबत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठासमवेत सामंजस्य करार
- पुणे जिल्ह्यात सुपा औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणासंदर्भात जपान बँकेसमवेत वाटाघाटी
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या