अकोला ते अकोट या मार्गावर बस सेवा तातडीने सुरु करावी- आमदार रणधीर सावरकर
अकोला ते अकोट या मार्गावर गांधीग्राम गावाजवळ क्षतिग्रस्त पुलाच्या दोन्ही बाजूनी ST बस सेवा तातडीने सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत च्या बैठकीत.आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रशासनाला सूचना ... बस सेवा तातडीने सुरू करा रेल्वे प्रशासनाची चर्चा शेतकऱ्यांच्या बैठक घेऊन त्यांना न्याय हक्काने रक्कम देऊन पूल अधिग्रहणाचा मार्ग सुकर करा.
अकोला अकोट मार्गावरील गांधीग्राम जवळील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने जरी वाहतूक वळविण्यात आली असली तरी पर्यायी मार्ग हा कोणत्याही दृष्टीने योग्य नाही. पर्यायी मार्गासोबातच पुलाच्या दोन्ही बाजूकडून अकोला व अकोट कडे जाणारी ST बस सेवा सुरु केल्याशिवाय प्रवाशी नागरिकांना दिलासा मिळणार नाही. सदरची बस सेवा सुरु करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गणोरकर पोलीस विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार एस टी महामंडळ इत्यादी सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून बस सेवा सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ST विभागास तातडीने आदेश निर्गमित करावेत या करिता सूचना केल्या. क्षतिग्रस्त झालेल्या पुलावरून नागरिक या टोकाकडून त्या टोकाकडे पायी जाऊ शकतात , पुलावरून जाणारी गर्दी आटोक्यात आण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजु कडून बँरीकेट लावण्यात यावे तसेच स्थानिक ठिकाणी पोलीस यंत्रणा तैनात असावी जेणे करून पुलावरून जाणाऱ्यांची गर्दी कमी करता येईल सोबतच खचत असलेल्या पुलाच्या नोंदी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवाव्यात जेणे करून खचत असलेल्या पुलाच्या खचण्याची तीव्रता लक्षात घेऊन तातडीने नागरिकांची ये जा बंद करता येईल. पुलावरून पायी येण्या जाण्यासाठी लोकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या सोबत दूरध्वनीवरून चर्चा करण्यात येऊन परिस्थिती नजरेसमोर ठेऊन व काळजी घेऊन नागरिकांचे आवागमन करणे शक्य आहे तसेच या बाबत जिल्हाधिकारी यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कळविण्यात यावे व त्या नुसार जिल्हाधिकारी यांनी बस सेवा सुरु करण्यासाठी त्वरित आदेश निर्गमित करावेत अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी बैठ्कीत दिल्या. गांधी ग्राम जवळील पर्यायी पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले असलेतरी भू संपादनाअभावी पुलाच्या पोच मार्गाचे बांधकाम बंद पडले असल्याने या करिता जमीन संपादन करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचनाही जल्हाधिकारी यांनी देण्यात आल्या आहेत. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोच मार्गाच्या करिता संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी पूर्ण करण्याच्या सूचना तालुका भूमी अभिलेख अधिकारी यांना करण्यात आल्या. बैठकीमध्ये अकोला,अकोट दक्षिण मध्य रेल्वे मार्गवरील रेल्वे शटल सेवा सुरु करण्याकरिता जिल्हाधिकारी तसेच आमदार रणधीर सावरकर यांनी नांदेड येथील डी.आर.एम विद्यासागर यांचे सोबत दूरध्वनी वरून चर्चा करून सदर शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय खडसे रेल्वे विभागाचे विभागीय सल्लागार समिती सदस्य वसंत बाछुका, गिरीश जोशी, सार्वजनिक बांधकाम महसूल विभाग अधिकारी अधिकारी तसेच विविध विषयावर चर्चा झाली,
जठार पेठ ते खरप न्यू तापडिया नगर ला जोडणारा उड्डाणपुलाला तीन कोटी मंजुर
अकोला
जठार पेठ ते खरप न्यू तापडिया नगर ला जोडणारा उड्डाणपुलाला खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर भाऊ सावरकरड यांच्या प्रयत्नाने आज तीन कोटी रुपये रेल्वे विभागाला राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
न्यू तापडिया नगर येथील मध्य रेल्वे तसेच दक्षिण मध्य रेल्वे यांच्या मधातील उड्डाणपूल जोडण्यासाठी 26 कोटी रुपयांची गरज असून त्यापैकी केंद्रीय उड्डाण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून अकरा कोटी रुपये पंधरा दिवसात केंद्र सरकारकडून राज्य सरकारला प्राप्त होऊन व ती रक्कम रेल्वे विभागाला जमा करण्यात आली आहे यापूर्वी आठ कोटी रुपये पंधरा दिवसांपूर्वी देण्यात आली होती आज खासदार संजय भाऊ धोत्रे व अकोला पूर्वचे आमदार प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नामुळे तीन कोटी रुपये रेल्वे विभागाला पूल निर्मितीसाठी दोन रेल्वे लाईन वरील जोडणारा पुलासाठी उपलब्ध करण्यात आला आहे त्यामुळे रेल्वे विभागाला टेंडर काढून काम करण्यास सुकर व सोयीचे झाले आहे सातत्याने जनता जनार्दनाच्या समस्या निराकरणासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर सावरकर प्रयत्नशील राहतात त्यामुळे या पुलासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री नितीनजी गडकरी यांनी भरघोस निधी दिला व आज त्यापैकी तीन कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे विभागाकडे च्या खात्यामध्ये जमा केले आहे 26 कोटी पैकी 11 कोटी रुपये जमा केल्यामुळे रेल्वे पुलाचा कामाला गती प्राप्त होणार आहे व लवकरच अजून निधी उपलब्ध होणार यासाठी आमदार रणधीर सावरकर प्रयत्नशील आहे अकोला शहरातील नवीन भाग तसेच ग्रामीण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण उड्डाणपूल निर्माण व्हावा यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी प्रयत्नशील करून या कामातील 60 टक्के काम पूर्ण झाला आहे चाळीस टक्के कामाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडे केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे त्याची फल श्रुती म्हणून गेल्या पंधरा दिवसात अकरा कोटी रुपये चा निधी उपलब्ध झाला आहे लवकरच रेल्वे विभाग यासंदर्भात तांत्रिक व विविध कामांना सुरुवात करून गती देणार आहे या संदर्भात खासदार संजय भाऊ धोत्रे व आमदार रणधीर सावरकर मध्य व दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे
0 टिप्पण्या