Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन!

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन!


मूर्तिजापूर तालुक्याला सरसकट नुकसान भरपाईची मागणी


आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाने दाणादाण उडविल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचा लाभ द्यावा, या मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील माना, कुरुम व जाम सर्कलमधील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी संबंधितांनी अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.


खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नगदी पीक समजले जाणारे सोयाबीन अतिवृष्टीमुळे नष्ट झाले असून, कपाशीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान वस्तुस्थिती आहे. झाल्याची जिल्ह्यात ८ हजारांवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाची सोंगणी रखडली, त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन तयार कसे करणार, या चिंतेत शेतकरी आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाण नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित मूर्तिजापूर तालुक्यातील माना, कुरुम व जामठी बु. सर्कलमधील राजनापूर खिनखिनी, कवठा सोपीनाथ, मरोडा, सैदापूर, चिंचखेड या गावातील व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी धडक देत पीक नुकसानाची सरसकट भरपाई देण्याची मागणी केली. आंदोलनात संजय सावळे, सचिन सावळे, बाबुराव बाजड, रूपेश कडू, अमोल वडतकर, राजू गवई, मंगेश कुकडे, गोकुळ बाजड आदी शेतकरी सहभागी झाले होते.


आंदोलनाने वेधले लक्ष !

जिल्हाधिकारी कार्यालयात मूर्तिजापूर तालुक्यातील दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी अंगातील शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेत घोषणा व निदर्शने देत प्रशासनाचे लक्ष वेधले. सोयाबीन कपाशी आदी पिकांच्या नुकसानाचे पंचनामे प्रशासनाने तत्काळ करून सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांची होती. काहीकाळ या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर मात्र गजबजून गेला होता.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या