लंपी रोगाचा प्रादुर्भ कमी होण्यासाठी लसीकरण युद्ध स्तरावर करावे- आ.सावरकर
अकोला
शेतकरी व ग्रामस्थांचे जोडधंदा व पर्यावरणासाठी पोषक असलेले गोधन व पशुधन टिकले पाहिजे त्यांच्यावर रोगराई पसरले नाही पाहिजे याची दक्षता घेण्याची गरज असून यासाठी महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्र सरकार गंभीर असून यासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही प्रशासनाने यासंदर्भात दखल घेऊन ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरण करण्याची गरज असून यासाठी आराखडा तयार करून प्रत्येक दुर्गम व सर्व क्षेत्रातील गावांमध्ये लोकप्रतिनिधी तसेच सर्व यंत्रणेचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने युद्ध स्तरावर कार्य करा असे निर्णय भाजपा प्रदेश सरचिटणीस व जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिले.
जिल्ह्यातील पशुधनावरील लम्पी रोगावर नियंत्रित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने सामाजिक जाणीवेतून व युद्ध पातळीवर काम करावे अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या-
राज्यातील पशुधनावर आकस्मिक रित्या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक पशुधन रोगग्रस्त झाल्याने पशुधन मालक मोठ्या संकटात सापडलेला आहे. पशुधनाची जीवित हानी होऊ नये या करिता पशुसंवर्धन विभागाने युद्ध पातळीवर काम करून मोठ्या प्रमाणात उपचार करण्याची मोहीम राबविण्यात यावी अशी सूचना आ.रणधीर सावरकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. जिल्ह्यातील लम्पी रोग ग्रस्त झालेल्या पशुंचा आढावा घेण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ दळवी, पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ बतकरे, डॉ खोडवे, डॉ सोनोने इत्यादींच्या समवेत आ रणधीर सावरकर यांनी चर्चा करून परिस्थितीचा व उपचार मोहिमीचा आढावा घेतला. लम्पी ग्रस्त जनावरांवरील उपचारासाठ आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा पडता कामा नये तसेच मोठ्या प्रमाणावर मनुष्य बळ उपलब्ध करून घेऊन या नैसर्गिक आपत्तीचा आपण सर्वांनी मिळून सामना करणे गरजेचा आहे. अकोला जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६९ पशुवैद्यकीय दवाखाने असून राज्यशासनाचे ६ दवाखाने आहेत. जिल्ह्यामध्ये १८ ऑगस्ट २०२२ रोजी लम्पी रोगाचे लागण झाल्याची आढळून आले होते. त्यानंतर या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत झाली असून या मदत कार्यात पशु विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच पदविकाधारक विद्यार्थी यांचा सुद्धा सहभाग घेऊन लम्पी रोगाचे नियंत्रण करावे अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी पशुसंवर्धन विभागाला केल्या.
जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात उपचाराच्या सुविधा कमी पडता कामा नये या कारणाने विशेष मोहीम राबविण्यात यावी. लम्पी रोग्ग्रस्ताचे नियंत्रणासाठी शासन सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. तसेच या बाबत शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल त्या करिता पशुसंवर्धन विभागाने दैनंदिन समस्या अवगत कराव्या तसेच दसरा – दिवाळी पूर्वी या रोगाचे समूळ नियंत्रण कसे करता येईल याची आखणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन विभागाने एका सामाजिक जाणीवेने करावा अशी भावनिक साद आमदार रणधीर सावरकर यांनी घालून शासन शेतकऱ्यांश्या पाठीशी भक्कम असल्याने शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे वतीने निर्माण करावा असे उपस्थित अधिकाऱ्यांना आवाहन केले. यावेळी अधिकाऱ्यांच्या अडचणी कोणाला त्रास याची सुद्धा माहिती आमदार सावरकर यांनी घेतली.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या