सत्यशोधक समाजाचा१५०वा वर्धापन दिवस साजरा व पुणे करार दिनाचा केला निषेध
अकोला:(BRCF) भगवान रविदास कम्युनिटीज फेडरेशन अकोला तर्फे २४सप्टेंबर २०२२शनिवार सायंकाळी ७.००वाजता सुधीर कालनी चौक अकोला येथे सत्यशोधक समाजाचा १५०वा वर्धापन दिन साजरा व पुणे करार दिनाचा निषेध करण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी बेस्ट टिचर अवार्ड प्राप्त प्रा.पी.जी.भामोदे होते.जमीनदार, शेठजी व पुरोहिताकडुन होणा-या अन्याय, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शुद्रातील शुद्र समाजाची मुक्तता करून देणे हे या सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर वानेडकर यांनी केले.पुणे करारामुळे आपल्या मागासवर्गीयांना मिळणारे प्रतिनिधित्व संपविण्यात आले.त्याबददल त्या कराराचा निषेध करण्यात आला.श्री.प्रल्हाद शेकोकार , गजानन कळसकर, श्रीराम राखोंडे ,राम शेगोकार यांनी परिवर्तनवादी विचारसरणी वर आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीरंजन गव्हाळे, नरहरी राजगुरू, ओंकार चिमणकर, महादेव इंगळे, ओंकार धुमाळे, सारंगधर डाखोडे, श्रीकृष्ण गवई, सूर्यप्रकाश चंदन, शामसुंदर पानझाडे, किसनराव पदमने,रुपराव चंदन, मेघश्याम ठोसरे, भिमराव अंबाळकर, गजानन चंदन यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.जी.भामोदे सर यांनी आपल्या अभ्यासापूर्ण भाषणातुन मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अड.शेषराव गव्हाळे यांनी तर आभारप्रदर्शन कोषाध्यक्ष विष्णू वाडेकर यांनी केले.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या