हिंदुमुस्लिम बांधवाच्या स्नेहाचे प्रतिक रमजान ईद कारंजा नगरीत साजरी !
कारंजा : सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रिय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या कारंजा नगरीत, रमजान ईद [ ईद - उल-फित्र ] निमित्ताने पोहा वेशीबाहेर असलेल्या ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवानी नमाज अदा केली . त्यानंतर संपूर्ण शहरात रमजान ईद या पवित्र सणाचा आनंद बघायला मिळाला . हिंदु मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत रमजान ईदच्या शुभेच्छा देतांना दिसत होते . कारंजा शहरातील समाजसेवी, पत्रकार तथा लोक कलावंत संजय कडोळे यांनी सुद्धा आपल्या मित्रमंडळींना शुभेच्छा दिल्यात . यावेळी त्यांनी आपले बालपणीचे सवंगडी तसेच शाळेतील वर्गमित्र सधन कास्तकार अब्दुल जलील अब्दुल रहिम यांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या . त्यांची मैत्री शहरात अनोखी मैत्री म्हणून ओळखली जाते.
पी. एस.खंदारे यांचा पालक मंत्र्यांच्या हस्ते सत्कार
महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळवीले की, "आधुनिक गाडगे बाबा" म्हणून वाशिम जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात नाव लौकिक मिळवून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे "पी. एस.खंदारे" यांचा विशेष सत्कार पालक मंत्री मा. ना.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.
१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन तथा जिल्हा परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून
वाशिम जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभाग वाशिम च्या वतीने वाशिम जिल्ह्यातील सर्व गावागावात "तुझं गावच नाही का तिर्थ" हे स्वच्छता व हागनदरी मुक्त गाव आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी प्रबोधन रथाच्या माध्यमातून महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले. या अभियानात सामाजिक कार्यकर्ते तथा अशासकीय सदस्य जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समिती आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम चे कार्याध्यक्ष पी एस खंदारे यांनी निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या वेशभूषा करून वाशिम जिल्ह्यातील गावागावात जाऊन वाशिम जिल्ह्यातील एकसे सत्याहत्तर गावात निष्काम कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या वेशभूषा करून स्वच्छता करत समाज प्रबोधन व स्वच्छता जनजागृती आणि कोरोणा व अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाचे महत्व विषयांवर जिल्हा परिषद कडून कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता सलग दोन महिने स्वच्छता रथा सोबत गावा गावातून जनजागृती केली म्हणून वाशिम जिल्हा पालक मंत्री मा. ना.शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे व जिल्हा परिषद मुख्याधिकारी तथा जिल्हा अधिकारी वसुमना पंत, आमदार अमित भाऊ झनक व आमदार किरणराव सरनाईक,सुरेशभाऊ मापारी, जिल्हा परिषद सदस्य व सर्व अधिकार ,कर्मचारी यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला.
या वेळी नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीस चे विदर्भ विभागीय उपाध्यक्ष राजीव दारोकार, नीलेश भोजणे,दतराव वानखेडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मुलना करीता पारदर्शी कार्य करणाऱ्या कलावंत पि एस खंदारे यांचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी व कारंजा येथील मित्र परिवाराने हार्दिक अभिनंदन केले आहे .
शेतीमित्र पुरस्काराने निलेश सोमाणी सन्मानित
राज्यपाल, उपमुख्यमंत्री व विविध मंत्री गणांची उपस्थिती
वाशीम : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार निलेश पुनमचंद सोमाणी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा पत्रकारीता कृषी क्षेत्रातील वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराने महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते सन्माचिन्ह, सन्मानपत्र व 30 हजार रूपये रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल कारंजा येथील, समाजसेवी संजय कडोळे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून कारंजा तालुक्यातिल मुळचे शेतकरी असलेले अष्टपैलू समाजसेवक तथा दैनिक मातृभूमिचे संपादक निलेश सोमाणी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की,नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ येथील धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधनी इमारत येथे 2 मे रोजी पार पडलेल्या भव्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित होते. मंचावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन व दुग्ध मंत्री संदीपान भुमरे, महाराष्ट्र विधानसभाचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, राज्याचे कृषी प्रधान सचिव एकनाथ डवले, राज्याचे कृषीआयुक्त धिरजकुमार यांची मंचावर उपस्थिती होती. वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार हा शेतकर्यांसाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल व लिखानाबद्दल राज्यातील तिन पत्रकारांना दरवर्षी निवड करून सन्मानित करण्यात येते. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी व बालरोगतज्ञ डॉ. हरिष बाहेती यांनी हा पुरस्कार स्विकारला.
सोमाणी यांनी अनेकवेळा शेतकरी मेळाव्याचे आयोजन, वाशीम येथे जलसिंचन परिषद, शेतकरी आत्महत्या प्रबोधनयात्रा, सायकल यात्रा, जनजागृती अभियान, लिखानाच्या माध्यमातून शेेतकर्याचे प्रश्न व समस्येची मांडणी, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून गत तिन वर्षापासून जिल्हयात सुजलाम सुफलाम अभियान राबवून हजारो हेक्टर जमीन सिंचनामध्ये आणण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान, अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना आर्थिक मदत,धुलीवंदनाला रंगामध्ये पैसे खर्च न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अनेकवेळा मदत, शासनाच्या महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराची रक्कम सोमाणी यांनी वाटरकप स्पर्धेत धनज बु. येथे दिली. शेतकरी आत्महत्याबाबत गणपती उत्साहात गत दहावर्षापासून प्रबोधन, हजारो व्याख्यानाव्दारे शेतकर्यांना प्रबोधन करण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे. तरूण क्रांती मंच वतीने तरूण क्रांती स्वाभिमान यात्रा देशात काढून अनेक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची भेट व त्यांना आर्थीक मदत व धान्यकिटचे वितरण, पुणे येथे बीजेएसच्या माध्यमातून वाशीम जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांतील मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेवून हा राज्यस्तरीय बहुमान त्यांना प्रदान केला आहे. सदर कार्यक्रमात महामहिम राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या विचारातून शेतकरी हा देशाचा आत्मा आहे. शेतकरी सुखी तर देश सुखी याप्रमाणे कोरोना काळात देशात व राज्यात अनेक उद्योगधंदे बंद पडले. अनेक व्यवसाय बंद पडले मात्र अशा विपरीत परिस्थीतही शेतकरी बांधवांनी पिक पिकवून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वांचा साथ, सर्वांचा विकास या उक्तीप्रमाणे शासनाने शेतकर्यांच्या विकासाकरीत विविध प्रकल्प व योजना कार्यान्वित करून त्यांना बळ द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी मंत्री दादाजी भुसे, तर आभार कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मानले. सदर यशाबद्दल विविध संघटना व हितचिंतकांनी सोमाणी यांचे अभिनंदन केले आहे. सदर कार्यक्रमाची सुरवात व सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या