हरबरा खरेदीला मुदतवाढ देऊन, खरेदी प्रक्रिया सुरु करा
अकोला
नाफेड कडून बंद करण्यात आल्या हरबरा खरेदीला मुदतवाढ देऊन बंद करण्यात आलेली खरेदी प्रक्रिया सुरु करण्यासाठी पोर्टल त्वरित सुरु करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री मा.ना. श्री नरेंद्रजी तोमर राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी पत्राद्वारे मागणी केली केली होती याची दखल देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन शेतकऱ्याच्या हिता केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या भावना कडून ताबडतोब न्याय देण्याची मागणी केली व या संदर्भात नामदार तोमर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे अभिवचन दिले आहे.
अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून हरबरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. या वर्षी हरबरा पिकाचे उत्पन्न चांगले असून केंद्र शासनाचे हमी भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा सुद्धा झाला आहे. हरबरा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत आर्थिक नुकसान होणार नाही या करिता नाफेड कडून बंद करण्यात आल्या हरबरा खरेदीला मुदतवाढ देऊन बंद करण्यात आलेली खरेदी प्रक्रिया सुरु करण्यासाठी पोर्टल त्वरित सुरु करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री मा.ना. श्री नरेंद्रजी तोमर यांचेकडे माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे तसेच आमदार रणधीर सावरकर यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. खरीप हंगाम जवळ असल्याने शेतकऱ्यांना आपला माल विकल्या शिवाय खरीप पिकासाठी आर्थिक नियोजन करता येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हरबरा विक्री शिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. नाफेड कडून खरेदी प्रीक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खुल्या बाजारात आपला माल विकावा लागेल परंतु खाजगी बाजारात हमी भावापेक्षा ८०० ते १००० रुपये प्रती क्विंटल कमी भाव असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
हरबरा खरेदी प्रीक्रिया सुरु करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते मा.ना देवेंद्र फडणवीस यांचे कडे मागणी लाऊन धरली. या मागणीची दाखल घेऊन मा. ना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री मा.ना. नरेंद्रजी तोमर याचे सोबत चर्चा करून खरेदी प्रक्रिया सुरु करण्याची मागणी रेटून धरली असता केंद्रीय कृषिमंत्री ना. नरेंद्र तोमर यांनी प्रक्रिया सुरु करण्याबाबत आश्वस्त केले आहे.
दिनांक २३ मे २०२२ पासून नाफेड तर्फे सुरु असलेली हरबरा खरेदी अचानक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन शेतकर्यांकडे विक्री अभावी घरात पडून असलेला हरबरा तातडीने विक्री व्हावा करिता नाफेड तर्फे सदर खरेदी प्रीक्रिया राबविण्यासाठी मुदतवाढ देऊन बंद करण्यात आलेले पोर्टल पुनश्च सुरु करण्यात यावे अशी मागणी खासदार संजय भाऊ धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी केली. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र अशा शेतकऱ्यांना यामुळे लागून 24 लाख शेतकरी होणार आहे आमदार सावरकर लोक नेते संजय धोत्रे यांची मागणीची दखल घेऊन महाराष्ट्राचे कर्तबगार विरोधी पक्षनेते व सर्वांच्या भावना समजून कार्य करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होणार आहे व शेतमाल खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे
विकास पुरुष नितीन गडकरी यांचा राजराजेश्वर नगरी मध्ये होणार भव्य स्वागत
वसीम चौधरी यांच्या विरोधात क** कारवाई करून सखोल चौकशी ची मागणी
अकोला वसीम चौधरी यांच्या विरोधात क** कारवाई करून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी जिल्हा प्रशासनाने देशाच्या 75व्या अमृत महोत्सव निमित्य या विद्यार्थ्यांच्या नेट परीक्षेसाठी निवड केली त्यांच्या त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होणार नाही या दृष्टीने सर्व कोचिंग क्लासेस विद्यार्थी संस्था यांना बोलून त्या विद्यार्थ्यांना मोफत तसेच संख्या वाढत असेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक सोय उपलब्ध होऊन होत होण्याच्या दृष्टीने पावले उचलावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने जिल्हाधिकारी नीलिमा अरोरा यांना एका निवेदनाद्वारे करून भविष्यात असे प्रकार घडणार नाही या संदर्भात दखल घेण्यात यावी व क** कारवाई करून असे अशा प्रकार करणाऱ्यावर ना पायबंद घालून त्यांच्या पाठीराख्यांना सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. अमृत महोत्सव निमित्य चांगल्या भावनेने जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक मिळावी यासाठी मोफत सुविधा करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक प्रश्न उपस्थित झाला असून यासाठी प्रशासनाने सर्व शैक्षणिक संस्थेची बैठक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा व त्यांची त्यांच्या भावना जागृत करण्याचं काम प्रशासनाने केली ती भावना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने केली आहे यावेळी उमेश गुजर निलेश काकड उज्वल बामनेट कराळे महेंद्र राजपूत रवी यादव नितीन राऊत रितेश जाम नारे केशव वेडा मयूर जाधव विकी विषय मयूर गुजर आनंद कदम संतोष काकडे भूषण इदारीया आनंद कदम अमोल घुगे मनिष बुंदिले चेतन पाटील अमोल गोगे, तुषार ठाकरे ऋषिकेश पोतले शुभम चोपडे विकी ठाकूर राहुल लोया आदींचा शिष्टमंडळात समावेश होता जिल्हाधिकारी श्रीमती नीलिमा यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन दोषी दोषींवर कारवाई करू असे अभिवचन दिले व यासंदर्भात पोलिस प्रशासनाला सूचना देऊ अशाही अभिवचन यावेळी शिष्टमंडळाला दिले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या