साडेतिन मुहूर्तातील दुसरे मुहूर्त अक्षयतृतिया
कारंजा : - "अक्षयतृतिया" या सणाला धार्मिक, आध्यात्मिक व शास्त्रीयदृष्ट्या फार महत्व दिल्या गेलं आहे . वैशाख शुद्ध तृतियेला अक्षय तृतिया साजरी केली जाते . यावर्षी मंगळवार दि . ३ मे २०२२ रोजी अक्षयतृतिया येत आहे .हा संपूर्ण दिवस, दिवसातील प्रत्येक क्षण, पवित्र मानला गेला आहे . या दिवशी गंगास्नान केल्यास मोक्ष प्राप्त होत असल्याची आख्यायिका आहे . म्हणून हिदू संस्कृती मध्ये या दिवशी नदीचे स्नान करतात .याच दिवशी कृष्णावतार भगवान परशुरामाचा जन्म झालेला तद्वतच पहिले समतावादी विचारवंत, लिंगायत धर्मसंस्थापक महात्मा बसवेश्वराचा जन्म झालेला आहे . या दिवशी बळीराजा आपल्या जमिनीची पूजा अर्चना करून, वृक्षारोपणाची मुहूर्तमेढ रोवतो . त्यामुळे भरघोस पिक होऊन अन्नपूर्णा प्रसन्न रहाते . यादिवशी केलेल्या दानधर्मामुळे, तुमचे धन सुरक्षित व अक्षय राहते . क्षय पावत नाही . म्हणजे कमी होत नाही .
या दिवशी सोने चांदी खरेदीला महत्व दिले जाते . या दिवशी सुवर्णालंकाराची खरेदी केल्यास लक्ष्मी प्रसन्न राहत असल्याची आख्यायिका आहे . शिवाय हिंदुधर्म संस्कृतिमध्ये मृतात्म्यांना प्रसन्न करून, त्यांना भोजनाने तृप्त करून, पितरांचे शुभाशिर्वाद घेण्याचा हा दिवस आहे . या दिवशी जमिन / प्लॉट खरेदी, प्रतिष्ठान,दुकानाचे उद्घाटन केल्यास व्यवसायात भरभराट होते . या दिवशी पंचागात मुहूर्त पहाण्याची गरज नसते . या दिवशी झालेले विवाहामुळे नवविवाहिताचे संसार सुख समाधानाने पुर्णत्वास जातात . खुद्द भगवान कृष्णाने युधिष्ठिराला अक्षयतृतियेचे महत्व सांगितलेले असून प्राचिन अठराही पुराणात अक्षय तृतियेचा उल्लेख आहे .अशी माहिती प्रसार . माध्यमाकडे, तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक संजय कडोळे, कारंजा यांनी दिली आहे .
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या