Ticker

6/recent/ticker-posts

भाजपाच्या 42 वे स्थापना दिवस विशेष

भाजपाच्या 42 वे स्थापना दिवस विशेष


भाजपाच्या  राष्ट्रसेवेने  प्रत्येकाच्या मनाला स्पर्ष केला

राष्ट्रसेवा आणि जनकल्याणाचे  लक्ष समोर ठेऊन, ४२ वर्षापूर्वी  भाजपाचे बिजारोपण झाले. वेळेनुसार संघर्षाचे  उन्हाळया -पावसाळयाचे चटके सहन करत, भाजपाचे रोपटे आज भारतीय राजकारणाच्या पटलावर क्रमांक एक चा भव्य वृक्ष झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराने राष्ट्रवादाला नेहमीच मन- मष्तिष्काला उर्जा दिली आहे. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या परिवाराची जबाबदारी समजून स्वत:ला राष्ट्रसेवेला समर्पित शिपाई समजून झोकून देत आहे. या प्रवासातील अनेक अडथडे पार करत, रा. स्व. संघाप्रमाणेच भाजपालाही राजकीय विरोधी जहराचे सेवन करीत  लक्ष गाठावे लागले. दरम्यान संघ व भाजपाला सांप्रदायिक शक्तिंनी सांप्रदायिक ठरविण्याचे अभियान सुद्धा चालविले . पण, हार किंवा विजयाची किंचितही काळजी न करता, भाजपाने उत्साह कायम ठेवला. आता भाजपाचे चांगले दिवस आले आहे. सद्दस्थिति अशी आहे की, भाजपाची संघठन शक्ति व  लोकप्रियतेच्या बाबतीत अन्य दल दूर-- दूर पर्यंत कोठेच दृष्टिपथास पड़त नाही. देशातच नव्हे तर भाजपा जगात  सर्वाधिक सदस्य संख्या असलेली पार्टी  समोर आली आहे.  भाजपाच्या या यशस्वी वाटचालीसह पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा बोलबाला संपूर्ण जगात पोहचण्यासाठी  अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान विसरू शकत नाही.           सन. १९५० मध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर  १९५१ मध्ये शामाप्रसाद मुखर्जींनी  जनसंघाची निर्मिर्ती केली. लक्ष स्पष्ट होते, लोकशाही बळकट करने. परंतु, परिवारवादी राजकीयांनी जनसंघाच्या मार्गात रोडे आणण्यात बिलकुल कसर सोडली नाही.  लोकशाहीचा गळा घोटल्या गेला. तेव्हाची आपात्कालीन स्थिति देश व जग कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर भारतीय राजकारणात नवी क्रांति आणण्याच्या उद्देश्याने १९७७ साली जनता पार्टीचा उदय झाला. त्यात जनसंघाचे विलनिकरण झाले. तेव्हा लोकसभेच्या  २९५  जागा जिंकत जनता पार्टीने देशाची सत्ता प्राप्त केली. परंतु, वैचारिक संघर्षात ३० महिन्यांत जनता पार्टीला सत्तेपासून दूर व्हावे लागले. अशा परिस्थितित सर्वश्रेष्ठ नेते अटल बिहारीजी, लोहपुरुष लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वात शामाप्रसाद मुखर्जीं, पं. दिनदयाल उपाध्याय, पं. बच्छराज व्यास यांच्या विचार व नीतींना अनुरूप नवीन राजकीय पार्टी तयार करण्याचा विचार प्रत्यक्षात उतरविला, ६ एप्रिल १९८० रोजी मुंबई  येथील अधिवेशनात  भारतीय जनता पार्टी ची स्थापना झाली. अटल बिहारी संस्थापक अध्यक्ष झाले. पुढे १९८६ पर्यंत ते या पदावर विराजमान राहिले.  दरम्यान १९८४ मध्ये भाजपाने पूर्ण ताकदीनिशी लोकसभा निवडणूक लढविली. त्यात भाजपा मताधिक्यात देशात दुस-या क्रमांकाची पार्टी म्हणून उदयास आली. परंतु, त्या निवडणुकीत भाजपाचे फक्त दोन उमेदवार विजयी झाले होते. कारण, तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे  देशातील जनता भाऊक झाली होती.  त्या भाऊकतेचा काॅग्रेसला फायदा झाला.  त्यानंतर १९८६  मध्ये लालकृष्ण आडवाणीं भाजपाचे अध्यक्षपदी आरूढ़ झाले. त्यानंतर  अटल -अडवाणींनी १९८९ मध्ये पार्टी मजबूत करण्याचा निर्धार केला. तेव्हा  गठबंधनाचा अनुभव घेत भाजपाने लोकसभा निवडणुकीत  ८५ जागा जिंकल्या. तेव्हा भाजपाचे मदतीने  जनतादलाचे विश्वनाथ सिंह पंतप्रधान झाले.  गठबंधनात असतानाही भाजपाने आपल्या विचारांना बाजूला न सारता,जनभावनेला प्राधान्य दिले. दरम्यान जनतादलाची साथ सुटली.         

जनतेला अपेक्षीत असलेल्या  अयोध्येत भव्य राम मंदिर निर्मिर्तीचा विचार भाजपाने हेरला आणि १९९० मध्ये लालकृष्ण आडवाणीं यांच्या नेतृत्वात सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा  काढली. याञेचे सारथत्व नरेंद्र मोदी यांनी केले. " रामलला हम आयेंगे-- मंदिर वही बनायेंगे " चा नारा दिला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत  भाजपने १२० जागा जिंकल्या, तेव्हा मुरलीमनोहर जोशी भाजपाचे तिसरे अध्यक्ष झाले. १९९५ दरम्यान  भाजपाने देशभरात विस्तार वाढविला. पण, भाजपाला सत्तेपासून दूर रहावे लागले. दरम्यान लोकसभेसह बहुतांश  विधानसभेतही भाजपाचा प्रभाव वेगाने  वाढू लागला. रामराज्याची संकल्पना जनतेला प्रचंड भावली आणि  १९९६ मध्ये भाजपाने लोकसभेत १६१ जागा जिंकल्या. तेव्हा गठबंधनात अटल बिहारी  दुस-यांदा  पंतप्रधान झाले. पण, हे सरकार १३ दिवसीय ठरले. पुन्हा निवडणुका झाल्या आणि १९९९ मध्ये  भाजपाच्या  नेतृत्वात एनडीएने ३०३ जागा जिंकल्या, अटलजी तिस-यांदा पंतप्रधानपदी आरूढ़ झाले. अटल बिहारी यांच्या नेतृत्वातील सरकार राष्टसेवा आणि जनकल्याणकारी  ठरले. दरम्यान भाजपाची प्रतिमा खराब करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला. पण, भाजपाला जनहिताची राजनीति करण्यात प्रचंड यश आले. दरम्यान काॅग्रेसने षड्यंत्र रचून वापसीचा खूप प्रयत्न केला.पण, त्यात काॅग्रेस चांगलीच तोंडघशी पडली. २००८ मध्ये देशातील दक्षिण क्षेत्र कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशसह काही राज्यांमध्ये भाजपाचे आलेली सरकारे जनताजनार्दनाच्या हितार्थ काम करीत  असताना, भाजपाला जनतेचे भरभरून प्रेम प्राप्त होत राहिले.         

   

                        
२०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर २८२ जगांवर विजय मिळाला, आणि भाजपाचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले.  दरम्यान भाजपाचे संघटन अधीक मजबूत झाले. हे सरकार जनतेला आपलेसे वाटायला लागले, कारण, मोदी सरकार ने केवळ जनहितार्थ कामांचा  ध्यास घेऊन, वाटचालीला वेग दिला. सबका साथ-- सबका विकास हे ब्रिद घेऊन, मोदींच्या नेतृत्वातील सरकार जनतेचा बुलंद आवाज़ झाले. परिणामस्वरूप   २०१९ साली नरेंद्र मोदी दुस-यांदा प्रधानमंत्री निवडल्या गेले.           

                  
   भाजपाला अध्यक्ष म्हणून कुशाभाऊ ठाकरे, लक्षमण बंगारू, जन. कृष्णमूर्ति, वेंकैया नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी,  अमित शाह, जगत प्रसाद नडडा यांचे सक्षम नेतृत्व लाभले.तरुण, तरुणी, महिला, वृद्ध आणि गरजूंसाठी भाजपा महत्वपूर्ण भूमिका वठवित आहे.  सर्वच वर्गातील नागरिकांच्या  हितार्थ भाजपा  अग्रेसर असून, भाजपा व सरकारची   सर्वञ प्रशंसा होत आहे." सबका साथ--सबका विश्वास, सबका-  विकास "  या घोषवाक्याला विश्वासात  उतरविण्याच्या उद्देश्याने भाजपा महानगर, जिल्हा, मंडळ, प्रभाग ते बुथ अंतर्गतच्या सर्वच  मतदारांपर्यंत विविध  लहान--मोठया कार्यक्रमांच्या  माध्यमातून  पोहचत आहे, त्यामुळे भाजपाप्रति  जनतेमध्ये सहानुभूति निर्माण झाली आहे. ६ एप्रिल   भाजपाच्या स्थापना दिवसानिमित्त  कार्यकर्त्यांसह  समस्त स्नेहींना    हार्दिक  शुभेच्छा  :   चंदन  गोस्वामी, भाजपा: प्रवक्ता पॅनेलिस्ट, भाजपा  महाराष्ट्र....

भारतीय जनता पार्टी ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त अकोला जिल्हा व महानगरात मला अभिमान आहे मी भाजपाचा या अभियानांतर्गत 5000 कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपाचा झेंडा महानगरात तर ग्रामीण भागामध्ये 20000 घरांवर झेंडा लावण्यात येणार असून सहा एप्रिल ते 10 एप्रिल पर्यंत विविध सामाजिक उपयोग उपयोगी कार्यक्रम खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर भाऊ सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या द कार्यक्रमात अंतर्गत आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल माजी महापौर अर्चना ताई मसने विविध आघाडीचे प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात कार्यक्रम होणार असल्याची माहिती माधव मानकर संजय जिरापुरे संजय गोडा, केशव ताथोड रमेश अप्पा खोबरे, गंगाखेडकर डॉक्टर विनोद बोर्डे चंदा शर्मा  कुसुम भगत, उमेश गुजर सचिन देशमुख यांनी दिली. जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विद्युतरोषणाई यानिमित्त करण्यात आली आहे
सहा एप्रिल बुधवार रोजी सकाळी साडेआठ वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालयावर झेंडावंदन जिल्हा भाजपच्या नेत्यांच्या व भाजपा पदाधिकारी विविध आधार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तसेच सकाळी दहा वाजता देशाचे पंतप्रधान व भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी यांचा लाईव्ह जनसंवाद कार्यक्रम हालसी संकुल येथे सामूहिक रीत्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पाहणार आहे तसेच ठिकाणी मोठी लावून हा कार्यक्रम महानगर जिल्हा तालुका स्तरावर व गाव पातळीवर होणार आहेत तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण तसेच नमो ॲप डाऊनलोड करून घेतली अकोला महानगरात सकाळी 11 वाजता महानगर फेरीवाला असेल तर्फे दुपट्टे वाटप तर लेडी हेडिग हॉस्पिटल ते भाजपा महिला आघाडीतर्फे कार्यक्रम सिटी कोतवाली येथे भाजपा युवा मोर्चा तर्फे दुपट्टे वाटप तर दुपारी बारा वाजता पूर्व मंडळातर्फे देशमुख मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल रामदासपेठ येथे आरोग्य शिबीर संध्याकाळी सात वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हनुमान चौक अकोट पहिली ते हा अभियान अंतर्गत साहेब 10 एप्रिल पर्यंत महानगरात विविध कार्यक्रम होणार असून भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते आपापल्या शक्ती केंद्रप्रमुख भूत प्रमुख नेमप्लेट लावतील युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी मोर्चा अनुसूचित जातीचे शेतकरी आघाडी अल्पसंख्याक आघाडी चे सर्व कार्यकर्ते वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणार असल्याची माहिती भाजप आणि दिली आहे ग्रामीण मध्ये कार्यक्रम प्रमुख म्हणून राजेश नागमोते यांची यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार राष्ट्रगीत विविध सामाजिक उपक्रम महानगरात व ग्रामीण भागात होऊन 43 कार्यक्रम होणार आहे


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या