आधुनिक भारताच्या विकासात महिलांचे योगदान
एकविसाव्या शतकात स्वतंत्र भारतातील स्त्री क्रांती मोठ्या टप्प्यावर उभी आहे. प्रामुख्याने शहरी विभागापुरते मर्यादित असलेले स्त्रीशिक्षण आता ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागापर्यंत विस्तारले आहे. एक स्त्री शिकली की, ती सारे कुटुंब साक्षर करते, संस्कारक्षम करते, या महात्मा फुलेंच्या वचनाला स्मरून स्त्री-शिक्षणाला भारतवर्षाने प्राधान्यक्रम दिला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात कोठारी कमिशनने स्त्रीशिक्षणाला प्राधान्य देऊन मोठी कामगिरी बजावली आहे. स्त्रीला शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत समान संधी आहे. भारतीय अंतराळवीर कल्पना चावला की जिने स्वतःच्या प्राणाची पर्वा नकरता अंतराळात सफर केली, त्याच पाठोपाठ सुनीता विल्यम्स यांचे नावसुध्दा आपल्याला सांगता येईल, आहारतज्ज्ञ कमला सोहोनी ह्यांनी कडधान्यांमधील ट्रिप्सीन इनहिबिटर्स, आरे दूध कॉलनीतील दूध, गुरांचे गवत, वासरांचा आहार, धानआट्यातील पौष्टिक घटक, नीरा या पेयातील उपयुक्त घटक, नीरा संशोधनाबद्दल त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट संशोधनाबद्दलचे राष्ट्रपती पारितोषिक त्यांच्या संशोधनासाठी मिळाले आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या जनक आयव्हीएफ तंत्रज्ञानातील तज्ज्ञ डॉ. इंदिरा आहुजा यांनी तीस वर्षांपूर्वी भारतात वैद्यकीय चमत्कार घडवून हर्षाच्या रूपात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देताना हर्षाच्या आईचे बाळंतपण केले होते. त्याच डॉ. आहुजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी हर्षाचे बाळंतपण केले. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील पहिली टेस्टट्यूब बेबी आई झाली हा एक विलक्षण योग ठरला, लेखिका अमृता प्रीतम ह्यांनी किशोरावस्थेत कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे, महादेवी वर्मा ह्या हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर ह्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून राहली.
नृत्यशारदा डॉ. कनक रेळे या एक मराठी नृत्यांगना आहेत. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यप्रकारांचे शिक्षण गुरु पांचाली करुणाकर पणीकर यांच्याकडून घेतले. मोहिनीअट्ट्म नृत्यप्रकाराची विशेष तालीम त्यांना कलामंडलम् राजलक्ष्मी यांच्याकडून मिळाली. डॉ. कनक रेळे गेली अनेक वर्षे नृत्यशिक्षणाचे काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत इ.स. १९६६ साली ’नालंदा डान्स ॲन्ड रिसर्च सेंटर’ आणि ’नालंदा नृत्यकला महाविद्यालय’ या संस्था स्थापन केल्या, अभिनेत्री शबाना आझमी ह्यांनी सुध्दा आपली करार्किद फिल्म क्षेत्रामधे ऊल्लेखनीय ठेवली आहे. कलाक्षेत्रात बरोबरच सामाजीक कार्यामुळे सुध्दा त्या अग्रेसर होत्या.
भारतात खेळक्षेत्र म्हटल की आपल्याला खूप साऱ्या खेळाडूंची नावे आठवतात, त्याची छायाचित्रे डोळ्यासमोर उभी राहतात आणि त्यातील महिला खेळाडू मधे सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, मिताली राज, याची अभिमानास्पद कामगीरी बघण्यास मिळतात. काही महिला खेळाडूंनी भारतील स्पोर्ट्स क्षेत्रात असा काही बदल घडवून आणलेला आहे की आज पालकांना आपल्या मुलीला स्पोर्ट्स क्षेत्रात करिअर करण्यास प्रेरणा देतात. तसेच प्रत्येक महिलेला समाजात स्पोर्ट्स विषय आवड निर्माण होईल. भारतीय महिला खेळाडूंनी आज कित्तेक पदके घेवून भारताचे नाव आंतरराट्रीय स्तरावर गाजवलेल आहे त्याचा प्रत्येक महिलेला अभिमान असला पाहिजे. अशी कितीतरी उदाहरणे स्त्रियांच्या विविधांगी क्षमतेची आपल्याला देता येतील, की जे आधुनिक भारताच्या विकासाला एक योगदान ठरले आहे.
ज्या देशात स्त्रीचे कर्तृत्व जगाला कमीपणाचे वाटते, त्या देशात स्त्रीचा आणि स्त्रीशिक्षणाचाही खर्या अर्थाने सन्मान होतो . त्यामध्ये सावित्रीबाई फुले नंतर आधुनिक काळात दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील शैक्षणिक आयोगाने स्त्रीशिक्षणास अधिक प्राधान्य देण्याची शिफारस केली होती. मुलींचे शिक्षण मुलांच्या बरोबरीने व्हावे, यासाठी स्त्रीशिक्षणाचा खास विभाग भारत सरकारच्या शिक्षण खात्याने निर्माण करावा प्रत्येक राज्यात स्त्रियांचे नेतृत्व असलेल्या स्त्रीशिक्षणविषयक आणि खेड्यांतल्या मुलींच्या शिक्षणावर सरकारने भर द्यावा, अशा महत्त्वाच्या सूचना त्यात होत्या. ‘ कमवा आणि शिका ’ या योजनेलाही येथे वाव होता. गृहशास्त्र, बालवाडी प्रशिक्षण या विषयांवरही बहु-उद्देशीय संस्था स्थापन होऊ लागल्या. कुसुम सयानी यांचे नाव प्रौढ साक्षरता मोहिमेत आघाडीवर होते. प्रौढांसाठी वेगळी, सोपी व सचित्र पुस्तके निघू लागली. सरोजिनी बाबर यांनी आपल्या वडिलांच्या मदतीने चालविलेले समाजशिक्षण मालेचे कामही उल्लेखनीय आहे.
तसेच भारतीय राजकारणामध्ये महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्या मधे इंदिरा गांधी याचे नाव प्राध्यान्याने घेतल्या जाते, यांनी दीर्घकाळ देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. आजही भारतीय राजकारणावर अनेक महिला नेत्यांचा प्रभाव आहे. तसेच सोनिया गांधी यांचा उल्लेख आजच्या भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून करण्यात येतो. सोनिया गांधींनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले असले तरी आजही त्यांचा काँग्रेसवर प्रभाव आहे. मायावती ह्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी प्रचंड संघर्ष करून राजकारणात यश मिळवले आहे. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशमधील प्रमुख पक्षांपैकी एक आहे. ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची ओळख आक्रमक नेत्या अशी आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दीर्घकाळ संघर्ष करून 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. आजही ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये प्रभावी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्रिपद दीर्घकाळ सांभाळण्याचा विक्रम शीला दीक्षित यांच्या नावावर आहे. त्या 1998 ते 2013 या काळात दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचीही सर्वात प्रभावी महिला म्हणुन राजकारण्यांमध्ये गणना होते. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासह केेंद्रात विविध पदांचा कारभार पाहणाऱ्या सुषमा स्वराज यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केली. राजघराण्याची पार्श्वभूमी असलेल्या वसुंधरा राजे यांनी दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्या केंद्रात मंत्रिपदावर देखील होत्या. राजस्थानमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन आहे. मा.शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेच्या सदस्थ असलेल्या सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये अनेक प्रभावी भाषणे केली आहेत. हवाई दलातील नोकरी सोडून राजकारणात आलेल्या वृंदा करात अल्पावधीतच डाव्या पक्षांमधील प्रभावी नेत्या बनल्या. 2005 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. तसेच त्यांना डाव्या पक्षांच्या पॉलिट ब्युरोमध्येही स्थान मिळाले होते. अंबिका सोनी यांनी काँग्रेसकडून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर त्यांनी विविध मंत्रिपदांवर काम पाहिले होते. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांनी मावळत्या लोकसभेमध्ये लोकसभेचे अध्यक्षपद प्रभावीरीत्या सांभावले होते. तसेच त्या इंदूर लोकसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून आल्या होत्या. सर्वच क्षेत्रांत स्त्रीशिक्षणासाठीचे प्रयत्न व शिक्षणाचा विकास ऊर्ध्वगामी झालेला दिसतो पण अजूनही भारतात शिक्षित स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अल्पसंख्य आहेत. स्त्रीला एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सबल पंख लाभत आहेत. स्त्रियांच्या म्हणून खास समजल्या जाणार्या नोकर्यांकडून वैमानिक, संशोधिका, शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता, संगणकतज्ञ,पोलिस अधिकारी, व्यवस्थापक, संपादक, उद्योजक, प्रशासक अशा स्त्रियांना खुल्या नसणार्या व स्पर्धात्मक जगात सत्ता हाती असणार्या महत्त्वाच्या स्थानांवरही स्त्रियांचा हळूहळू प्रवेश होऊ लागला आहे. स्त्रीशिक्षणाने तिला आपली उन्नती करण्याची ऊर्जा दिली असून त्यांना पुरुषांइतकाच अधिकार प्राप्त झाला आहे. जेव्हा खेड्यांतील आणि दुर्गम भागांतील प्रत्येक मुलगी शिक्षित झालेली असेल, तेव्हा भारताची नोंद विकसनशील देश अशी न राहता विकसित देश अशी होईल.
लेखक-
प्रा. प्रज्ञानंद श्रीकृष्ण थोरात
मो. 9822674487
गुडधी, अकोला
0 टिप्पण्या