कलावंताच्या हक्काकरीता प्राण गेला तरी बेहतर
कारंजा : महाविकास आघाडी मधील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करीत असल्यामुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री वाशीम जिल्ह्यात रूची घेत नसल्यामुळेच, जिल्ह्यातील कलावंताची कुचंबना होत असून, 'कला हेच जीवन' मानून आपले अख्खे आयुष्य राष्ट्रिय जनजागृती आणि समाज प्रबोधनाकरीता वेचणाऱ्या, ऐतिहासिक - पारंपारिक - खानदानी लोककलावंताची जिल्ह्यात परवड सुरु असून, कोरोना महामारी पासून तर गोंधळ - जागरण, वाघेमुरळी, भजन, भारुड, किर्तन, शाहीरीचे सर्वच कार्यक्रम बंद पडल्यामुळे खानदानी - जातीवंत कलावंताची दुर्दशा होत असल्याचे स्पष्टपणे पिठासिन निवासी ना . तहसिलदार राजेश ढोमडे यांना कलावंताच्या अडचणीबाबत अवगत करीत, विविध आंदोलनाबाबत सुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष : महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त लोककलावंत संजय कडोळे यांनी तहसिल कार्यालयात ना तहसीलदार यांना विनम्रतेने सांगीतले की,"पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने तात्काळ - जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समितीची पुनर्रचना करत स्थापना करून लवकरात लवकर, गेल्या तिन वर्षापासून रखडलेल्या सन 2020,2021 व 2022 या वर्षाच्या बैठका घेऊन जिल्हयातील कलाकारांना मानधन मंजूर केले तर ठिक नाहीतर कलावंताच्या न्याय हक्कासाठी माझा प्राण गेला तरीही चालेल .
पण दि .14 एप्रिल 2022 पासून, बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल . व कलाकारांच्या मागण्या पूर्णत्वास जाईपर्यंत तिव्र आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगीतले . "व आम्हा कलावंताची रितसर असलेली मागणी पूर्ण करण्याचे दृष्टिने आमचे निवेदन - मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे, सांस्कृतिक मंत्री ना अमित देशमुख तथा पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई यांचे म्हणजेच शासनापर्यंत पोहचवा . असे निक्षुण सांगीतले . यावेळी विदर्भ लोककलावंत संघटनेचे पदाधिकारी व कलावंत तसेच पत्रकारमंडळी उपस्थित होते
अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या