महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत स्व.आबासाहेब खेडकर यांचे योगदान महत्वाचे —सुधाकरराव साबळे
अकोला—संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीत स्व.आबासाहेब खेडकर यांची खंबीर भूमिका होती.ग्रामविकास मंत्री म्हणुन महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे अमूल्य योगदान असल्याचे प्रतिपादन विदर्भ समाज संघ मुंबईचे अध्यक्ष सुधाकरराव साबळे यांनी केले.
अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने स्व.आबासाहेब खेडकर जयंतीनिमित्त स्वराज्यभवनासमोर आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार ,सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड,सामाजिक कार्यकर्ते देविदास नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे स्थापन करण्यात व खारपानपट्ट्यातील पाणी पुरवठा योजना ही स्व. आबासाहेब खेडकर यांचीच देण असल्याचे प्रतिपादन महादेवराव भुईभार यांनी केले. ज्येष्ठ सर्वोदयी प्रा.राजाभाऊ देशमुख यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना आँनलाईन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन ऋषीकेश निमकंडे यांनी केले.
सर्वश्री राजुभाऊ माळगण,किशोरभाई मिश्रा,येळणे मामा,खुशालभाऊ गायधने,बबलुभैय्या ओझा,विक्की देवाते,शुभम मेहरे,श्रीकृष्ण माळी,सचिन थुटे
यांचेसह सर्वोदयी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या